नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत… जगामध्ये शिवरायांच्या विचारांना पुजले जाते… परदेशी विचारवंत म्हणतात… जर शिवराय आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांच्या शौर्याच्या कथा आमच्या मुलांना सांगितल्या असत्या… खोटे काल्पनिक कौमिक्सचे हिरो तयार केले नसते…भारतात सैन्य भरती करताना ब्रिटिशांनी सैनिकांना शिवरायांची शपथ देण्याची प्रथा सुरु केली होती… मी शिवरायांचा सुपुत्र शपथ घेतो की… अशी या शपथेची सुरुवात असायची… सैन्याचे घोषगीतही… वीर शिवाजी के बालक हम… असे होते… अशा या विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर हॉटेलच्या जाहिरातीत होत असल्याने सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा होत आहे… सदर जाहिरातीत… शिवराय बसले भोजनास, तृप्त झाले स्वराज्य… असा आशय असून एक प्रतिमा छापण्यात आली आहे… त्या प्रतिमेला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे… इतिहासकालीन महापुरुष संपूर्ण राष्ट्राचे , देशाचे प्रेरणास्थान असले तरी त्यांच्या नावाचा वापर खाजगी संस्थेसाठी करताना त्यांच्या विद्यमान वंशजांची परवानगी घेणे आवश्यक असते… दुसरे म्हणजे महापुरुषांची प्रतिमा व नाव वापरताना त्यांचा अपमान होणार नाही… याची खबरदारी घेणे आवश्यक असते… कारण याच्याशी करोडो लोकांच्या भावना जोडलेल्या असतात… त्या दुखावल्या तर विपरीत परिणाम होतात… दरम्यान सदर हॉटेलच्या नूतन वास्तूचा भव्य शुभारंभ १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कामोठे- नवी मुंबई येथे होत आहे… बॅनरवर उदघाटक म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचे नाव आहे…