उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
महाराष्ट्राशिवाय संपूर्ण देशभरात होळी आणि धुळवडीची धामधूम असताना रायगड जिल्ह्यातील भेंडखळ गावानजीक असणाऱ्या द्रोणगिरी नोड येथे असणाऱ्या तलावात घनश्याम संतराम जयस्वाल (वय 32 वर्ष रा.उत्तर प्रदेश ) या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 14 मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली असल्याची माहिती,मृत व्यक्तीच्या भावाने भावाने उरण पोलिस ठाण्यात दिली आहे…
शुक्रवारी (14मार्च ) रोजी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करून झाल्यानंतर उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील तलावात, घनश्याम जयस्वाल हा त्याचे मित्र मुकेश चौधरी, दिनेश यादव, अमरजीत यादव यांचे सोबत आंघोळ करण्यासाठी गेला होता. मात्र घनश्याम जयस्वाल याला तलावाच्या पाण्याचा अंदाज न घेता आल्यामुळे बुडाला व त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन तो बेशुद्ध पडला असल्याचे लक्षात येताच त्याला उरण येथील रुग्णवाहिका मधुन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे आणले असता कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले आहे. घनश्याम जयस्वाल धुळवडीच्या दिवशी अंघोळ करण्यासाठी गेला होता. मात्र, याची आयुष्याची शेवटची अंघोळ या तलावात झाली असल्याचे, मित्रमंडळी यांनी हळहळ व्यक्त केली.
घनश्याम हा भारत गॅस या प्रकल्पात येणाऱ्या वाहनांवर चालक म्हणून कार्यरत होते. या घटनेची माहिती उरण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला. याबाबत उरण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.