रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला ‘होळी पौर्णिमा’ असेही म्हटले जाते. होलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी…. धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुळवड साजरी केली जाते…काही ठिकाणी रंगपंचमीला रंग खेळण्याची पद्धत असते…. सर्वत्र धुळवडीचा उत्साह असतो. रंग खेळण्यात तरुणाई सोबतच लहान मुलं देखील दंग असतात… असाच रसायनी मोहोपाडा परिसरात धुलीवंदन उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला… यावेळी हरिपार्क, सोसायटी व निवारा सोसायटी मधील सर्व बालगोपाळ एकमेकांवर रंगाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात मग्न झाल्याचे दिसून येत होते…. धुलीवंदनाच्या आदल्या दिवशी सोसायटीतील स्त्रिया एकत्र येऊन होळी मातेची नैवेद्य देऊन मनोभावे पूजा अर्चा केली…