विधानसभा निवडणुकीआधी मोठे फटाके फुटणार ?… भाजपला गळती…महाराष्ट्रात सरकार येण्यावर शंका…

0
73

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :- 

जहाज बुडू लागले की,पहिल्यांदा जहाजातील उंदीर पळायला लागतात…असेच चित्र सध्या महाराष्ट्र भाजपात पहायला मिळत आहे…महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येईल की, नाही याबाबत शंकेचे वातावरण असल्याने अन्य पक्ष सोडून भाजपात आलेल्यांनी भाजपा सोडून पुन्हा परतीचा प्रवास सुरु केला आहे…लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका या पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात होणार आणि प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळेच राहणार असे पक्षाने स्पष्ट करताच भाजपाचे शेअर मार्केट गडगडायला लागले आहे…भाजपात आलेल्यांनी परतीचा मार्ग पत्करला आहे…विशेष म्हणजे जाणाऱ्यांना थांबवू शकत नाही त्यांना जावू द्या अशी हताश भूमिका घेऊन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दरवाजे स्वतःच्या हातानीच उघडून दिले आहेत…त्यामुळे भाजपच्या संघटनेत मोठी खळबळ उडाली आहे…

लोकसभा निवडणुकीत जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी उबाठात प्रवेश केला होता…आता विधानसभेच्या तोंडावर कोल्हापूर-कागलमधील मोठे नेते आणि राजघराण्यातील समरजित घाडगे यांनी भाजपाला रामराम केला असून त्यांनी हातात तुतारी घेतली आहे…तर इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी ही भाजपाला सोडचीठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे…विशेष म्हणजे घाडगे यांना भाजपने विधान परिषदेची ॲाफर दिली होती ती नाकारुन ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात गेले तर, हर्षवर्धन पाटील यांना सहकार क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील दिलेले पद सोडून ते भाजपाला रामराम करणार आहेत. भाजपमध्ये येऊन अडगळीत पडलेल्या नांदेडच्या आणखी एका नेत्याने भाजपला रामराम ठोकला आहे…माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे…निवडणूकीच्या तोंडावर मुंबई भाजपाला दोन मोठे झटके बसण्याची शक्यता असून माजी खासदार पुनम प्रमोद महाजन, माजी मंत्री प्रकाश मेहता हे दोघे उबाठामध्ये जाऊ शकतात असा राजकीय जाणकरांचा अंदाज आहे. तर मुलुंडचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे हे सुध्दा पुन्हा उबाठामध्ये जाऊन मुलुंडमधून आमदारकी लढतील अशी सूत्रांची माहिती आहे…