शेकापला रायगडात पाहिजेत २ जागा पण मागणी चारची… सुनबाईंसाठी जयंत पाटलांची राजकीय खेळी… एकूण ६ जागा…

0
62

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

अलिबाग विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकाप नेते जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि.22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी भव्य सभा आयोजित करण्यात आली. यावेळी जयंत पाटीलांनी अलिबाग-रोहा-मुरुड मतदारसंघात चित्रलेखा पाटील, पेणमध्ये अतुल म्हात्रे, पनवेलमध्ये माजी आ. बाळाराम पाटील, उरणमध्ये प्रीतम म्हात्रे, सांगोल्यात बाबासाहेब देशमुख व कंधारमध्ये श्यामसुंदर शिंदे या उमेदवारांची नावे जाहिर केली… एकूण ६ जागांवर त्यांनी दावा केला… त्यातील ४ विधानसभा रायगड जिल्ह्यातील आहेत… महाविकास आघाडीमध्ये जयंत पाटीलांना राहायचे आहे… त्यामुळे आपल्या ताकदीपेक्षा जास्त जागांची मागणी त्यांनी केली आहे… जास्त मागू तेव्हा कमीअधिक मिळेल असे एक समीकरण आहे… या समीकरणानुसारच जयंत पाटीलांनी ६ जागांची मागणी केलेय… ६ मागतील तेव्हा २ जागा मिळतील… जयंत पाटलांनाही  महाविकास आघाडीतुन दोनच जागा पाहिजेत… एक अलिबाग व दुसरी पेण… पनवेल उरणशी त्यांना देणे घेणे नाही… जयंत पाटलांना आपल्या सुनबाईंची राजकीय सोय करायची आहे…त्यामुळे सख्खे बंधू  माजी आमदार पंडित पाटीलांना डावलून त्यांनी चित्रलेखा पाटीलांना उमेदवारी जाहिर केली आहे… उमेदवारीबाबत कुटुंबातच धुसफूस आहे… तशीच परिस्थिती महाविकास आघाडीतून लढताना रायगड जिल्ह्यात आहे… पनवेल, उरणमध्ये शेकाप आग्रही आहे… नेते आणि कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी जयंत पाटीलांनी पनवेल , उरणचा आग्रह धरला आहे… महाविकास आघाडीतून त्यांची ही मागणी पूर्ण होणार नाही… याची कल्पना जयंत पाटीलांनाही आहे… मात्र सुनबाईंचा खुट्टा मजबूत करण्यासाठी जयंत पाटीलांनी अलिबाग, पेण, पनवेल, उरण विधानसभा मतदारसंघांवर दावा केलाय… वस्तुतः महाविकास आघाडीतून शेकापच्या वाट्याला पेण आणि अलिबाग याच जागा येणार आहेत…

सुनबाईंसाठी जयंत पाटलांनी राजकीय खेळी करून रायगडसह महाराष्ट्रात एकूण ६ जागांची मागणी केली आहे… पनवेल आणि उरणमध्ये शेकापला मर्यादा आहे… कर्नाळा बँक घोटाळा आणि ठाकुरांसोबत साट्यालोट्याचे राजकारण… यामुळे शेकापची ताकद मर्यादित आहे… शेकापने अजुनपर्यंच्या राजकारणात पनवेल नेहमी ठाकूरांना आंदण दिले… ठाकुरांसमोर कमजोर उमेदवार दिले… प्रत्येकवेळी शेकापचा पराभव झाला… यावेळीही विजय होईल याची कोणतीही शाश्वती नाही… शेकापला पुन्हा वैभवाचे दिवस आणायचे असतील तर त्यांनी महाविकास आघाडीसोबत राहणे गरजेचे आहे… महत्वाचे म्हणजे यावेळी परिस्थिती विरोधात असल्याने शेकापने पनवेल, उरणचा आग्रह धरणे सोडावे…