रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या राजाभाऊ मधुकर ठाकूर यांनी ईव्हीएम विरोधात जन आंदोलनाची घोषणा केली आहे… रायगड जिल्ह्यात हे जनआंदोलन होणार आहे…छत्रपती शिवराय व भीमराय यांच्या आशीर्वादाने जनआंदोलनाला सुरुवात होणार आहे… यावेळी पवित्र किल्ले रायगडावर शंखनाद करण्यात येणार आहे… तसे निवेदन २६ नोव्हेम्बर रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात आले आहे..या निवेदनात राजाभाऊ ठाकूर म्हणतात की…मी राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर मु. सातिर्जे ता अलिबाग येथील रहीवासी असून मी २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधान सभेच्या निवडणूकीमध्ये १९३ श्रीवर्धन मतदार संघातुन निवडणूक लढविलेली आहे…ही निवडणूक आम्ही प्रचंड मेहनतीने लढविलेली असून आम्हाला प्रचार दौरे व सभांमध्ये जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता, मतदानाच्या दिवशी मतदारांनी आम्हाला भरभरून मतदान केलेले होते…परंतु मतदान यंत्र व VVPAT मध्ये अगोदरच छेडछाड करून मतांमध्ये केलेल्या हेराफेरीमुळे माझ्या समवेत महाराष्ट्र राज्यातील बहूसंख्य उमेदवार मतदान यंत्र बाधीत होउन पराभूत झालेले आहेत…सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या महाराष्ट्रात या मतदान यंत्र (EVM) व VVPAT मुळे लोकशाहीचा खुन झालेला आहे…ही मतदान यंत्र (EVM) व VVPAT जोपर्यंत बंद होत नाहीत किंवा नवीन पर्याय प्राप्त होत नाही तोपर्यंत पारदर्शक पदधतीने कोणत्याही निवडणूका पार पडणार नाहीत व नेहमीच लोकशाहीचा गळा घोटला जाईल हे त्रिवार सत्य आहे… भारतीय निवडणूक आयोग, मतदान यंत्र (EVM) व VVPAT द्वारे घेत असलेली निवडणूकीची ही पदधत बदलण्यासाठी लोकशाहीला मानणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी मी जनआंदोलन तीव्र छेडणार आहे, या जनआंदोलनाची सुरुवात किल्ले रायगड येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पमालीका अर्पण करून, शंखनाद करून करण्यात येणार असून महाड येथील ऐतीहासीक चवदार तळयाला भेट देउन, १९३ श्रीवर्धन मतदार संघातील माणगाव येथील उपजिल्हाधीकारी यांच्याकडे आमच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे… आमच्या मागण्या मा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या कानांपर्यंत बातमी पत्रादवारे व दुरदर्शन (TV) चैनल मार्फत पोहचविण्याचे प्रयत्न करणार आहोत… या जनआंदोलनात सहभागी होण्यासाठी मी लोकशाहीला मानणारचा सर्व सामान्य जनतेसोबत महाराष्ट्रातील सर्वधर्मीय सामाजीक संघटना, NGOS तसेच मतदान यंत्र (EVM) व VVPAT मुळे बाधीत झालेल्या महाराष्यतील प्रमुख पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांना ‘जाहीर आवाहन करणार असून सर्व संबंधीतां बरोबर चर्चा करून मी आपल्याला या जनआंदोलनाची तारीख कळविणार आहे… आम्ही तारीख कळवील्यानंतर या जनआंदोलना द्वारे लोकशाही वाचवण्याकरीता आपण आम्हाला या जनआंदोलनासाठी रीतसर परवानगी दयावी.आपण जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी या नात्याने आम्हाला परवानगी द्याल याची आम्हाला खात्री आहे, परंतू कोणत्याही दबावामूळे आपण आम्हाला या जनआंदोलना करीता परवानगी दीली नाहीत तर होणाऱ्या जनआंदोलनाला व जनप्रक्षोभाला प्रशासनाला जबाबदार राहावे लागेल असा इशारा शेवटी राजेंद्र ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी दिला आहे…