मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात चौघांचा झाला मृत्यू…अपघातातील मृत व्यक्तीच्या वारसांना मिळणार मदत…

0
60

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-

शुक्रवारी पहाटे मुंबई – गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्टेशन जवळ टोईंग व्हॅनच्या धडकेने झालेल्या अपघातात महाडमधील चार तरुणांचा दुदैवी मृत्यू झाला… यामुळे संपूर्ण महाड तालुक्याव एकच शोककळा पसरली होती.या घटनेची माहिती राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी खात्याचे मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांना समजताच त्यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करित मृतांच्या कुंटूबिया प्रति संवेदना व्यक्त करित जखमिंना तातडीने आणि चांगले उपचार होण्यावर गोगावले यांनी वैद्यकिय यंत्रणेस आदेश दिले होते. काल नामदार भरतशेठ गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सदरच्या दुदैवी अपघाताचा माहिती देत अपघातातील सर्व मृत तरुण गरीब कुंटूंबातील असल्याचे सांगत त्यांना आपण मदत करणे गरजेच असल्याची विनंती भरतशेठ गोगावले यांनी मुख्य मंत्र्याना केली असताना तात्काळ त्यांनी ती मान्य केली. या अपघातामध्ये सुर्यकांत सखाराम मोरे वय ५२ रा . नवेनगर,, रुतीक नथूराम शेलार २५ व प्रसाद रघूनाथ नातेकर २५ रा कुंभारआळी व समिर मिंडे ३५ रा दासगाव या चार मयतांच्या वारसाना मुख्यमंत्री साह्यता निधीतून पाच लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.