यंदाच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना खुश करण्याचा प्रयत्न… इन्कम टॅक्सची मर्यादा 7 लाखांवरून थेट 12 लाखांपर्यंत…

0
44

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पांत अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. करदात्यांना देखील मोठा दिलासा देण्यात आला आहे. १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.इन्कम टॅक्सची मर्यादा 7 लाखांवरून थेट 12 लाखांपर्यंत नेलेली आहे…त्यामुळे 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा मोठा फायदा नोकरदारांना, मध्यमवर्गीय वर्गाला होणार आहे…भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये हा निर्णय  मैलाचा दगड ठरेल, असे माझे मत आहे.शेती क्षेत्रात 100 जिल्हे ठरवून त्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवली जाण्याची योजना, जलजीवन मिशन असेल. शेती क्षेत्रात विविध प्रकारची गुंतवणूक सरकारने घोषित केली आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे…महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल झालेले आहे. 21 व्या शतकातील हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे. देशाला पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे… ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजावरील कर कपातीची मर्यादा सध्याच्या ५०,००० रुपयांवरून दुप्पट करून १,००,००० रुपये करण्यात आली आहे.. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट करून ५०,००० रुपयांवरून १ लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.३६ जीवनरक्षक औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आले आहे. सीतारामन यांनी 36 जीवन रक्षक औषधांचा ड्युटी टॅक्स पूर्णपणे रद्द केला आहे. सर्व सरकारी रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर बनवण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. कॅन्सरवरील उपचारासाठीची औषधे आता स्वस्त होणार आहे. सहा जीवन रक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी 5 टक्के करण्यात आली आहे…5वर्षात10 हजार मेडिकलच्या जागा वाढवण्यात येणार आहेत. IITमध्ये 6500 सीटें वाढवण्यात येणार आहेत आणि 3 AI सेंटर उघडण्यात येणार आहेत. AI शिक्षणासाठी 500 कोटीचा बजेट ठेवण्यात आला आहे…