रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार ) :-
वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषत: प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे, ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो…मोहपाड्यात वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत…ज्यामुळे नागरिकांना खूप त्रास झाला…
मोहोपाडा येथील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह कामगार व शालेय विद्यार्थीना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे…सर्वात मोठा औद्योगिक परिसर म्हणून ओळख असलेल्या रसायनी पाताळगंगा परिसरातील मोहोपाडा ही मुख्य बाजारपेठ असून या परिसरात नेहमीच वर्दळ असते.शालेय विद्यार्थी व कामगार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असल्याने वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थीना शाळेत व कामगार वर्ग यांना कामावर वेळेत पोहोचता येत नसल्याने संताप व्यक्त होत असून दिवसेंदिवस होणारी वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.