आमचे मत राजाभाऊ ठाकूरांना… प्रेमाचे आहेर पाकिटाला… श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राजाभाऊ ठाकुरांची जोरदार हवा…

0
46

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

रायगड जिल्ह्यात खऱ्या अर्थाने काँग्रेसला उर्जित अवस्था आणण्याचे काम कोणी केले असेल तर ते स्वर्गीय माजी आमदार मधुकरशेठ ठाकूर यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर यांनी…माणसातील राजा आणि राजातील माणूस म्हणून राजाभाऊ ठाकूर प्रसिद्ध आहेत… अलिबाग विधानसभा मतदारसंघात गोरगरिबांच्या हक्काचा माणूस म्हणून राजाभाऊ ठाकूरांना ओळखले जाते…तेच राजाभाऊ आता श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत… त्यामुळे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राजाभाऊ ठाकुरांची जोरदार हवा निर्माण झाली आहे…यापूर्वी अलिबागसह रायगड जिल्ह्यात राजाभाऊंनी केलेल्या विकासकामांचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल आहेत… हे व्हिडिओ शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनेलच्या हाती आले आहेत…या व्हिडिओतून राजाभाऊंची गोरगरिबांप्रती तळमळ,लढाऊपणा,आक्रमकता दिसून येत आहे… हे व्हिडिओ पाहून श्रीवधनकरांना असाच लढाऊ आमदार पाहिजे… असे श्रीवर्धनमधील जनता बोलत आहे… पत्रकारांशी बोलताना श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेने आमचे मत राजाभाऊ ठाकूरांना असे जाहीर करून त्यांची निवडणूक निशाणी प्रेमाचे आहेर पाकीट आम्ही मतांनी भरभरून देणार असे सांगितले…

राजाभाऊ ठाकूर उच्चशिक्षित असून ते व्यवसायाने इंजिनीअर आहेत… व्यवसायातील प्रामाणिकपणा त्यांनी आपले वडील माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांच्याकडून घेतला आहे…  राजाभाऊ ठाकूरांना व्यवसायात तसेच राजकारणात त्यांच्या भावांची-बहिणींची,सर्व कुटुंबीयांची साथ आहे… २००४ साली त्यांचे पिताश्री स्वर्गीय मधुकर ठाकूर अलिबाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले…वडिलांच्या विजयात राजाभाऊंचे नियोजन,योगदान होते… २००४ साली राजाभाऊ अलिबाग तालुक्यातील सातिर्जे ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी निवडणून आले… सन २००४ ते २००९ या काळात त्यांनी सरपंच पद भूषविले… आणि आपल्या कामाचा ठसा उमटविला…त्यांच्या नेतृत्वात पुढील दोनवेळा दहा वर्ष सातिर्जे   निवडणूक बिनविरोध झाली… राजाभाऊंनी आजवर शासकीय योजना तळागाळातील जनसामान्या पर्यंत पोहचवल्या… रस्ते,पाणी,वीज,आरोग्यसेवा याचबरोबर शेतकऱ्यांचे-कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविले…

शासनाचा निधी येण्यासाठी वेळ लागतो… त्यामुळे राजाभाऊ ठाकुरांनी स्वखर्चातून लोकांचे प्रश्न सोडविले आहेत… जसे अलिबाग तालुक्यातील बोडणी कोळीवाडा येथील मच्छी मार्केटला हायमास्ट लाईट दिला… बामणसुरे गावातील स्मशानभूमीचे काम स्वखर्चाने केले… मुरुड-नांदगाव येथे विहिरीचे पाणी गावात येण्याकरिता स्वखर्चाने पंप व पाइपलाईन टाकून दिली आहे… अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याकरिता विहीर दुरुस्तीची कामे,व आरसीसी टाक्यांचे बांधकाम स्वखर्चाने करून दिली आहेत… २००७ साली राजाभाऊ ठाकुरांनी देशातील पहिले फिरते आरोग्य रुग्णालय सुरु केले… काही वर्षांपूर्वी स्वतःच्या वाढदिवशी पंचक्रोशीकरिता रुग्णवाहिका भेट दिली…किहीम अदिवासीवाडी येथील समीर दत्तू नाईक या आदिवासी मुलाला  डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी आर्थिक साहाय्य केले..अलिबाग येथील किंग डेव्हिड या उच्चशिक्षित बोर्डाच्या शाळेत नर्सरी ते दहावी पर्यंत दरवर्षी एक अशा एकूण ५ गरीब मुलांना पूर्ण मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आहे…गोरगरीब अनाथ मुलांना शिक्षणासाठी भरघोस आर्थिक मदत केली आहे… रोहा तालुक्यातील चिंचवली येथील बेबीताई पवार या  गरीब आदिवासी वृद्ध आजीबाईंची जीवनकहाणी झी २४ तास या वृत्तवाहिनीने दाखवली… त्यानंतर या कुटुंबाच्या मदतीला राजाभाऊ पुढे आले… आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी १ लाख रुपयांची मदत बेबीताई पवार यांच्या ४ नातींना केली… या रकमेचा धनादेश आणि कायम ठेवींच्या पावत्या बेबीताई पवार त्यांना प्रधान केल्या… एवढ्यावरही न थांबता या कुटुंबाला आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले… तसेच या मुलींना शिकविणाऱ्या शिक्षकांचा ही या निमित्ताने सत्कार केला…