न्याय द्या…न्याय द्या… मितेश पाटीलला न्याय द्या… मितेश पाटीलच्या हत्येप्रकरणी गडब ग्रामस्थांचे कँडल मार्च…

0
40

 रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

रायगड जिल्ह्यातील अलिबाग बीच येथे बियरची बाटली फुटली या शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून ओमकार सुरेश भुकवार,विशाल विजयकुमार वंटे,प्रथमेश शेखर घोडेकर,राज रमन जयगडकर ,प्रमोद किशन साठविलकर यांनी पेण तालुक्यातील गडब येथील मितेश पाटील याची निर्घृण हत्या करीत त्याचा मित्र प्रथमेश पाटील याच्यावर वार करीत जखमी केले होते…या प्रकरणातील आरोपींना अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर साळे आणि त्याच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर एक ते दीड तासाच्या आत जेरबंद केले होते. आता या आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे…तरी या आरोपींवर लवकरात कठोर कारवाई होवून मृत  मितेश पाटील याला न्याय मिळावा या मागणीसाठी गडब येथील ग्रामस्थांनी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते…
पेण तालुक्यातील गडब येथील मृत मितेश पाटील व त्याचा जखमी मित्र प्रथमेश पाटील हे अलिबाग येथील वरसोली येथील विठोबाच्या यात्रेसाठी आले होते…यात्रेतून फिरून झाल्यानंतर ते बियर पिण्यासाठी अलिबाग बीच येथे गेले होते. तिथे बियर पिल्यानंतर बाटली ठेवतना ती फुटली आणि ओमकार भुकवार ,विशाल विजयकुमार वंटे,प्रथमेश शेखर घोडेकर,राज रमन जयगडकर, प्रमोद किशन साठविलकर यांच्यात बाटली फुटल्यावरून वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेले…आणि त्या वादातून मितेश पाटील याची हत्या तर प्रथमेश पाटील याच्यावर वार करण्यात आले…या मध्ये मृत मितेश पाटील यांच्यावर वाद करताना आरोपी ओमकार भूकवार यांच्या पोटाला त्याच्या साथीदार याच्याकडून चाकू लागून जखम झाली आहे… आरोपींपैकी ओमकार भूकवार याच्या पोटाला चाकू लागून जखम झाली असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले…त्यामुळे मृत मितेश पाटील याचा साथीदार प्रथमेश पाटील याने त्याला ओळखले असल्याने त्याच्यासोबत असणाऱ्या इतर आरोपीची नावे सुद्धा पोलिसांना समजली. त्यामुळे  त्याच्या मोबाईल फोनचे लोकेशन काढून त्यांना ताब्यात घेतले होते.मात्र सदर आरोपींना वाचविण्यासाठी पेण व अलिबाग येथे राज्यातील सत्तेतील काही राजकीय पदाधिकारी हस्तक्षेप करीत असल्याच्या चर्चा देखील जोरदार रंगू लागल्या आहेत..गडब ग्रामस्थ आणि मृत मितेश पाटीलच्या मित्र मंडळीच्या म्हणण्यानुसार शुल्लक बाटली फुटली मात्र ती काही जाणीपूर्वक फोडली नव्हती…त्याच्यावरून या आरोपींनी मितेशची हत्या करावी यावरूनच आरोपी समाजासाठी मोठे धोक्याचे आहेत…अशा आरोपींना न्यायव्यवस्थेने कठोरात कठोर  कारवाई करून प्रमुख आरोपी असणाऱ्या ओमकार भूकवार आणि विशाल वंटे यांच्यावर योग्य ते गुन्हे दाखल करून मितेशला न्याय मिळावा अशी मागणी समस्त गडब ग्रामस्थ करीत आहेत…