मुंबई शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंकेसह शेखर म्हात्रे):-
गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली आहे. गेटवे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे…बोटीत ३० हून अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे…दोन बोटींचा एकमेकींना धक्का लागल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे… बचावकार्य युद्धपातळीवर प्रवाशांच्या बचावासाठी प्रयत्नशील आहे…मुंबई पोलीस आणि भारतीय नौदल यांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे…प्राथमिक माहितीनुसार, ही प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जात होती. जिओसीकडून प्राप्त माहितीनुसार, एलिफंटाकडे जाणारी नीलकमल (खाजगी) ही नौका उरण, कारंजाजवळ उलटली आहे….प्राथमिक अहवालानुसार या बोटीत सुमारे ५६ प्रवासी होते… घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. सागरी पोलिस आणि १०८ रुग्णवाहिका एकत्रित बचावकार्य करत आहेत. कोस्ट गार्डकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात २१ प्रवाशांना वाचविण्यात आले असून १ व्यक्तीस मृत घोषित करण्यात आले आहे…ही बोट नेमकी कोणत्या कारणामुळे बुडाली, याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, ही बोट बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर आजुबाजूच्या बोटींनी तात्काळ घटनास्थळी जात बचावकार्य सुरु केले. ताज्या माहितीनुसार, नीलकमल बोट ही समुद्रात पूर्णपणे बुडाली आहे. आता प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.