नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
रायगड जिल्ह्यातील तीन माजी पोलीस हवालदारांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आत्मदहनाचा इशारा दिला होता…प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा टोकाचा निर्णय त्यांनी घेतला होता…मात्र २६ जानेवारीच्या आत प्रशासनाकडून निर्णयाची प्रतीक्षा त्यांनी केली होती…हीच बातमी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनेल लावली होती…याच बातमीचा इम्पॅक्ट झाला असून दडपशाही, खोट्या आरोपांचा जाच आणि प्रशासनातील दुर्लक्ष यावर मात करून पोलीस हवालदार रवींद्र राठोड व प्रशांत कांबळे यांनी न्यायाचा पहिला किरण अनुभवला आहे…त्यांच्या पुन्हा सेवेत नियुक्तीमुळे केवळ त्यांचेच नव्हे तर सत्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या संघर्षाला यश आले आहे. “शिवसत्ता टाइम्सच्या प्रखर आणि लढवय्या पत्रकारितेने या अन्यायाची दखल घेत प्रशासनाला सणसणीत इशारा दिला…ज्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला…जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले होते, तेव्हा पत्रकारितेच्या मशालीने अंधार फोडला…शिवसत्ता टाइम्सच्या बातम्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट सवाल उपस्थित करत, त्यांनी या अन्यायग्रस्त प्रकरणाला न्यायालयाच्या चौकटीत बसवले…माध्यमांचे बळ किती प्रभावी असते, याचा हा उत्कृष्ट नमुना आहे…राठोड हे केवळ एक पोलीस हवालदार नाहीत तर ते सामान्य नागरिकांच्या अन्यायाविरुद्ध उभ्या राहण्याच्या हिंमतीचे प्रतीक बनले आहेत…खोट्या खटल्यांमध्ये प्रशासनाने त्यांना बाजूला ठेवले होते. पण सत्यावर निष्ठा ठेवल्यामुळेच आज त्यांना न्याय मिळाला आहे…खरेपणाला वेळ लागतो, पण ते अखेर विजयश्री मिळवते…राठोड यांना पुन्हा सेवेत घेणे प्रशासनासाठी डोळे उघडणारा निर्णय ठरला…फक्त कामगिरीवर बेतलेली पोलीस फोर्स राठोडसारख्या कर्मचारीमुळे टिकून आहे…असे मत अनेक ज्येष्ठांनी व्यक्त केले…या घटनेने प्रशासनावरचा विश्वास वाढवण्याचे काम केले आहे. राठोड यांचे पुन्हा नियुक्ती हे या लढाईचे पहिले पाऊल आहे. पण राठोड यांना त्रास देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणे तेवढेच गरजेचे आहे, अशी मागणी जनतेकडून होऊ लागली आहे…राठोड व कांबळे यांच्या संघर्षाने आज प्रत्येकाला एक प्रेरणा दिली आहे…सत्य कधीच झुकत नाही. त्यासाठी लढण्याची तयारी ठेवा, कारण शेवटी विजय सत्याचाच होतो…