लग्नाकरिता जाणाऱ्या जाधव कुटुंबियांच्या बसवर काळाचा घाला… ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ बस पलटी…

0
55

 माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):- 

ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. या बस मध्ये जाधव कुटुंबीय लग्नाकरता पुण्याहून बिरवाडीला जात असताना अपघात झाल्याचे समजते… बसचा ताबा सुटल्याने ती पलटी झाली असून या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० ते २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून पोलीस, रेस्क्यू टीम, आणि वैद्यकीय मदत घटनास्थळी पोहोचली आहे. जखमींना शक्य तितक्या लवकर उपचार मिळावेत यासाठी प्राधान्याने प्रयत्न सुरू आहेत.अपघातातील जखमींना त्वरित उपचार मिळावेत यासाठी पोस्को कंपनीची ऍम्ब्युलन्सही घटनास्थळी पोहोचली. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ताम्हिणी घाट हा आपल्या धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो. या भागात पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिकच खराब होते, ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. प्रशासनाने या अपघाताचे कारण शोधून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.ताम्हिणी घाटात अशाप्रकारचे अपघात वारंवार घडत असल्यामुळे सुरक्षितेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत… घाटातील अरुंद रस्ते,धोकादायक वळणे आणि खराब हवामान यामुळे हा भाग प्रवाशांसाठी आव्हानात्मक ठरत आहे…