लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या बसवर काळाची झडप… अपघातात ५ वऱ्हाडांचा मृत्यू…३० ते ३५ जण गंभीर जखमी…

0
61

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका प्रवासी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने ती पलटी झाली असून, या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅव्हल्समध्ये काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रॅव्हल्स चाकणवरून वीरवाडीला (महाड), लग्नाला चालली होती. या घटनेमुळे एक खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव येथून जाधव कुटुंब हे महाड येथील बिरवाडी येथे बसमधऊन लग्नसमारंभासाठी खासगी बसने जात होते. ट्रॅव्हल्स खाजगी बस (क्रमांक.MH14GU3405) ही रस्त्यावरून जात असताना ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ धोकादायक वळणावर बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि बसचा भीषण अपघात झाला. ही गाडी पूर्णपणे पलटी झाली आणि पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 2 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश आहे. संगीता धनंजय जाधव , गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार आणि वंदना जाधव अशी मृतांची नावे असून पाचव्या मृत पुरूषाची ओळख अजून पटलेली नसल्याने त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. अपघातात ३५ प्रवासी जखमी असून काही जण बसमध्येही अडकले आहेत.प्रशासनाने या अपघाताचे कारण शोधून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे…