खातेवाटप जाहीर होताच पालमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच…रायगडच्या पालमंत्रीपदावर भरतशेठचा १०० % दावा…

0
42

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

महायुती सरकारचे खातेवाटप शनिवारी जाहीर झाले. खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदावरून महायुतीत नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण खातेवाटप जाहीर होताच युतीतील नेत्यांनी आता पालकमंत्रिपदावर दावा करायला सुरूवात केल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा केलाय. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच होणार असल्याचे बोलले जात आहे.महायुतीच्या खाटेवाटपात भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन, खार जमीन विकास या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे. ती व्यवस्थित पार पाडायची आहे. महाराष्ट्रासाठी जे काही चांगलं करता येईल ते करायचं आहे. मला काल खाते मिळालेलं आहे. नेमकं त्यात काय काय आहे ते पहावे लागले. त्यानंतर पुढची दिशा ठरवू, असे त्यांनी म्हटले.ते पुढे म्हणाले की, मंत्री पद मिळाल्यानंतर आज पहिल्यांदा रायगडमध्ये जात आहे. माझे कार्यकर्ते स्वयंस्पूर्तीने जंगी स्वागत करतील. रायगडच्या सहाही आमदारांनी सांगितले आहे. आम्हाला पालकमंत्री हवंय, त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदावर 100 टक्के दावा असल्याचे त्यांनी म्हटले. आता भरत गोगावले यांच्या दाव्यानंतर रायगडचे पालकमंत्रीपद नेमकं कोणाला मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  मागील काळात अनेक नेत्यांनी कोटवरून आपल्याला डिवचले. आता आपण कोट घातलाय आणि मंत्रि‍पदाची शपथ देखील घेतली आहे. शपथविधी सोहळ्यानंतर आपण अजित पवार आणि तुमच्यात नेमकी काय कुजबुज झाली होती, असे विचारले असता भरत गोगावले म्हणाले की, दादांना आठवण करून दिली. ते त्यावेळी बोलले होते की, मी कुठेही असलो तरी मला निमंत्रण द्या, मी राज्यपालांना सांगतो आणि म्हणून मी त्यांना आठवण करून दिली की, दादा मी पण आता मंत्री झालोय, कोट ही घातलाय, त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले, असा टोला भरत गोगावले यांनी अजित पवार यांना लगावला.