अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्यात नवनव्याने प्रकल्प व उद्योगधंदे उभारले जात आहेत… अशातच औद्योगिकी करणाच्या प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत… मात्र अनेक वर्षे इथं कोणताही प्रकल्प उभारला जात नसून, या जमीनी पडीक राहत असल्याने शेतकरी वर्गात असंतोष उफाळून येतोय…
अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड खारेपाट विभागातील हजारो शेतकऱ्यांनी न्यायहक्कांसाठी एल्गार पुकारला आहे… पूर्व भूसंपादन व सद्य पुनरसंपादनातील संपादन संस्थांकडून गैर कारभार होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय… खारेपाटातील 3000 एकर शेत जमिनी पैकी 800 एकर कृषी व 400 एकर अकृषी जमिनी 2006 साली टाटा विद्युत प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या…. यापैकी 70 टक्के जमीनी सलोख्याने व 30 टक्के जमीनी सक्तीच्या भूसंपादनाद्वारे संपादित करण्यात आल्या… याविरोधात शेतकरी पेटून उठलेत…. आमच्या शेत जमिनीला योग्य मोबदला मिळावा, स्थानिक भूमिपुत्र शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार मिळावा, पुनर्वसन करण्यात यावे, तसेच साडे बारा टक्के भूखंड देण्यात यावा या प्रमुख मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढा उभारलाय, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रकल्पाला विरोध असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय…