गोआश्रम येथे अखंड हरिनाम सप्ताह…सोहळ्याच्या निमित्ताने दुर्गम आदिवासी भागात नवचैतन्य निर्माण… 

0
61

 शिवसत्ता टाइम्स चौक (अर्जुन कदम) :

भक्ती वेदांत गोआश्रमात अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने दुर्गम आदिवासी भागात नवचैतन्य निर्माण झाले होते… या सात दिवस चाललेला भव्य हरीनाम  सोहळ्याची सांगता आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली…
खालापूर तालुक्यातील इरसाल वाडीच्या पायथ्याशी दुर्गम भागात भक्ती वेदांत गोआश्रम चॅरिटेबल ट्रस्ट यांची गोशाळा आणि गुरुकुल आहे… या गोशाळा व गुरुकुल मध्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते…  या भक्ती वेदांत गोआश्रम चॅरिटेबल ट्रस्ट मध्य ७० गाई असून, गुरुकुल मध्य ३३ मुले क्षिक्षण घेत आहेत… दर महिन्यातील पाच दिवस मुलींना शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि त्यांनी स्वतःचे संरक्षण करावे, यासाठी लाठीकाठी, तलवार चालवणे, मैदानी खेळ आणि रणरागिणी शौर्य प्रशिक्षण देण्यात येते… गुरुकुल वसतिगृहात परराज्यातील ३३ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना हिंदू धर्माचे संरक्षण आणि त्यांचे महत्व पटवून देऊन त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते… यावेळी गोआश्रम शाळेला सर्व प्रकारची मदत आमदार महेश बालदी यांनी जाहिर केली… यावेळी भक्ती वेदांत गोआश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक दिनेश महाराज मते, अध्यक्ष अनंत महाराज पाटील, भाजप नेते विनोद भोईर, जयानंद मते, गणेश माळी, दिनेश घोगरे, चंदर धनगर (बावधाने ) उपस्थित होते… दक्षता कडव, कल्पना  घोगरे, गौरी धनगर (बावधाने ) सपना मते, जयश्री माळी, सोनिया  कडव, शंतनू कडवं, गुरुदत्त गायकर, राजू पाटील, मुरलीधर  पाटील, सचिन म्हात्रे आदिंनी विशेष मेहनत घेऊन हा हरीनाम सप्ताह पार पाडला….