शिवसत्ता टाइम्स चौक (अर्जुन कदम) :
पारतंत्र्यात आणि स्वातंत्र्यात बांधलेले पाणवठे विकासाच्या नावाखाली पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत, असेच चित्र दिसत आहे… ब्रिटीश राजवटी अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रस्त्याने, आडवाटेने जाणाऱ्या घोडदळ, पायदळ किंवा वाटसरुंची पिण्याच्या पाण्याची सोय केली जात असे, त्यानंतर ब्रिटीश राजवटीत स्वातंत्र्यात देखील असे पाणवठे बांधण्यात आले होते… तर ब्रिटीश गेल्यानंतर पारशी समाजातील लोकांनी विहिरी, शाळा बांधल्याची नोंद असलेल्या नोंदी सरकारी दप्तरी दिसत आहेत…
दरम्यान हे पाणवठे मार्गावरच दिसतात, त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत… तर मार्गावर असलेले पाणवठे विकासाच्या नावाखाली पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत… रस्ता रुंदीकरण आणि विकास ही काळाची गरज बनली आहे… पण हे करत असताना जुना पाणवठा नेस्तनाबूत होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणेने घेण्याची गरज आहे… सध्या चौक कर्जत मार्गाचे दुपदरीकरण की चौपदरिकरण होत आहे, हे नक्की सांगता येत नसले तरी रस्ता रुंदीकरण होत आहे… याच मार्गावर पाली बुद्रुक हे महसुली गाव असून, कर्जत तालुक्याच्या सीमेवर आहे… चौककडून कर्जतला जाताना डाव्या बाजूला पाली बुद्रुक या गावच्या हद्दीतही रस्त्यालगत विहीर असून, विहिरीचे बांधकाम मजबुतीने उभे असून, विहीर पाण्याने भरलेली आहे… मात्र तिच्या चारही बाजूंनी झुडुपांनी तिला घेरले आहे… रस्त्याने जाताना सहसा ती दिसत नाही… सद्या ही विहीर नेस्तनाबूत किंवा रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अदृश्य होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे… याबाबत आपण जिल्हा अधिकारी आणि संबंधित यंत्रणेला कळवीनार असल्याचे पत्रकार अर्जुन कदम यांनी सांगितले…