रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रोहा तालुक्यातील पंच-रोहा परिसरात शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादाला न्याय मिळावा यासाठी शिवाजी नाईक आणि त्यांच्या पत्नी शिवाली नाईक यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे…गेल्या तीन दिवसांपासून हे उपोषण सुरू असून प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे… शिवाली नाईक यांच्या मते,आमच्या आईच्या जन्मताच म्हणजे जन्माला येऊन सुद्धा वडिलांना मुली नाहीत या खोट्यानोंदी दाखल केल्या व आईच्या निधनानंतर वारस म्हणून आम्ही हक्कदार असतानाही, तहसील कार्यालयात वारस नोंदी करण्यात आल्या नाही आहेत… न्याय निकालाला २ वर्ष झालीत व अगोदरच्या आईला जिवंत पणी सिद्ध करायला एकूण ९वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला आहे…असे नाईक यांचे म्हणणे आहे…कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने असूनही,न्यायालयाने वारस तपास करून नोंद करण्याचे आदेश दिले आहेत…तरीही तहसीलदार वारस नोंद करण्यास टाळाटाळ करत आहेत… आम्ही सर्व आवश्यक पुरावे सादर केले असून, अजून कोणते पुरावे लागतात, हे प्रशासनाने स्पष्ट करावे… यावेळी शिवाजी नाईक म्हणाले की,२०१६ पासून हा वाद प्रलंबित आहे… आणि आई जिवंत असतानाही रजिस्ट्री नोटरी झाली आहे तसे विरोधार्थी यांनी म्हणजेच चोरगे यांनी कबूल केले आहे… पण अद्याप न्याय मिळालेला नाही. गेल्या नऊ वर्षांत दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही, उलट ज्यांनी गुन्हा केला ते खुलेआम फिरत आहेत. यामध्ये तत्कालीन तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचा हात असल्याचा आमचा आरोप आहे…शिवाजी नाईक हे अपंग असूनही न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले…मी अपंग असूनही मला न्याय मिळत नाही…जर प्रशासनाने त्वरित योग्य कारवाई केली नाही, तर मी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्यास बाध्य होईन…स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपोषणाला मोठा पाठिंबा दिला आहे…प्रशासनाने त्वरित दखल घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे…याप्रकरणी तहसील कार्यालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही…