पुणे शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
महाराष्ट्राचा ५८ वा वार्षिक निरंकारी संत समागम २४ जानेवारीपासून पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म मैदानावर सुरू झाला आहे. सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात आयोजित या तीन दिवसीय समागमात देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी झाले आहेत. या भव्य समागमात सतगुरुंच्या प्रवचनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.समागमाच्या उद्घाटनप्रसंगी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी “विस्तार केवळ बाह्य स्वरूपाचा नको, तर अंतरिक विकासही तितकाच महत्त्वाचा आहे” असे मार्मिक उद्गार काढत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक व व्यक्तिगत उन्नतीचे महत्त्व पटवून दिले.संत समागमासाठी भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, कॅन्टीन, पार्किंग, स्वच्छता आणि लंगर यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. लंगर व्यवस्थेत प्रत्येकाला मोफत भोजन पुरवले जात आहे. मैदानाच्या सर्व भागात स्वच्छतेचे विशेष नियोजन केले आहे.या समागमातील बाल संस्कार प्रदर्शनी विशेष आकर्षण ठरत आहे. महाराष्ट्रातील १७ शहरांतून प्रेरणादायी मॉडेल्स येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत, जी मुलांमध्ये सद्गुणांची प्रेरणा निर्माण करीत आहेत.विदेशातून आलेले डॉक्टर्स व कायरोप्रॅक्टर्स भाविकांची सेवा करत आहेत. विविध प्रकारच्या वैद्यकीय उपचारांच्या माध्यमातून भाविकांना दिलासा दिला जात आहे…या भव्य समागमात भक्तांच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी सतगुरुंचे प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजसेवेचे उपक्रम राबवले जात आहेत. लाखो भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे समागमाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे….