टीम इंडियाचा एकामागून एक विजयाचा धुमधडाका…मलेशिया, श्रीलंके पाठोपाठ आता बांगलादेशलाही पाजले पाणी…

0
76

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :- 

अंडर नाईनटीन वूमेंस वनडे इंटरनॅशनल वर्ल्ड कप २०२५ मलेशिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत Team India ने बांगलादेश विरूद्ध एकतर्फी विजय नोंदवत प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आणि भारतीयांचा उत्साह द्विगुणित केला.भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना कौलालंपूर येथील ब्युमास ओव्हर या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने ८ गडी राखून हा विजय मिळवला. मागील सामन्यांच्या ते भारतीयांनी दमदार गोलंदाजी करत बांगलादेशचा स्वस्तात पाडाव केला. वीस षटकात अवघ्या ६४ धावा देत बांगलादेशच्या ८ विकेट्स पटकावल्या.बांगलादेशची कर्णधार सुमैय्या अख्तरने सर्वाधिक २१ धावा केल्या. याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा गाठता आला नाही. भारताकडून वैष्णवी शर्माने १५ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले.टीम इंडियाने ६५ धावांचे लक्ष अगदी सहज गाठले. गोंगडी ट्रिशाने ३१ चेंडूत ८ चौकारांसह ४० धावा केल्या. तर सानिका चाळके हिने नाबाद ११ आणि निक्की प्रसादने नाबाद ५ धावा काढत भारताला विजय मिळवून दिला.टीम इंडियाने याआधी वेस्ट इंडिज, मलेशिया, आणि श्रीलंका या संघांना पराभूत केले आहे. अशा स्थितीत भारतीय महिला संघ पुन्हा एकदा अंडर नाईनटीन वूमेंस वनडे इंटरनॅशनल वर्ल्ड कप २०२५ चार प्रबळ दावेदार मानला जात आहे. येत्या २८ जानेवारीला स्कॉटलंड विरूद्ध टीम इंडिया पुढचा सामना खेळणार आहे.