मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
कोंकणातील सर्वसामान्यांची दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करून त्याच प्लॅटफॉर्म वरून त्याच वेळेत गोरखपूर तसेच बलिया मार्गावर गाड्या चालवणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाला माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज दणका दिला.दि.९जानेवारीला दिलेल्या पत्रांची आठवण करून देत ही गाडी पुर्वी प्रमाणे दादर येथून सुटली नाही तर येत्या १ मार्च रोजी गोरखपूर आणि बलिया ट्रेन सुटून देणार नाही, असा सज्जड इशारा कोंकणवासीयांच्या वतीने मध्य रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे.जवळपास वीस वर्षे दादर जंक्शन वरून रत्नागिरी करिता सुटणारी पॅसेंजर गाडी कोरोना काळात बंद करण्यात येऊन दिवा येथून ती सोडली जात आहे. ती पूर्वीप्रमाणेच सोडली जावी म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिनांक ९ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधील मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयात महाप्रबंधकांची भेट घेऊन दादर- रत्नागिरी पॅसेंजर ही गाडी पुर्वीप्रमाणेच दादर जंक्शन येथूनच सोडण्यात यावी अशी मागणी केली होती.गेल्या अनेक महिन्यांपासून कोंकणवासीयांचा समावेश असलेल्या विविध प्रवाशी संघटनांचा यासाठी लढा सुरू आहे.या पार्श्वभूमीवर माजी खासदार विनायक राऊत यांनी रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा बुधवारी मध्य रेल्वे प्रशासनाला स्मरणपत्र दिले आहे. या स्मरणपत्र आत म्हटल्याप्रमाणे पूर्वी प्रमाणेच दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू झाली नाही तर येत्या दिनांक १ मार्च २०२५ रोजी गोरखपूर/बलिया मार्गावर सोडल्या जाणाऱ्या गाडीसमोर रेल रोको आंदोलन करून या पुढे जाऊ दिल्या जाणार नाहीत, असा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांनी मध्य रेल्वेच्या उप-महाप्रबंधकांना प्रत्यक्ष भेटून दिला आहे…