राज्यमंत्री योगेशजी कदम यांच्या जनता दरबाराला सुरुवात… “सत्ता ही जनसेवेसाठीच…”:राज्यमंत्री ना.योगेशजी कदम…

0
38

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-

योगेशजी कदम यांनी राज्यमंत्रीपदाची धूरा सांभाळल्यापासून आपल्या मतदारसंघात विकास कामांचा उरक हाती घेत जनसेवेस वाहून घेतले आहे… आता तर राज्यातील व आपल्या मतदारसंघातील जनतेला आवाहन केले आहे की, राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे जी कोणती खाती वर्ग करण्यात आली आहेत त्यासंबंधीचे कोणतेही प्रश्न वा समस्या राज्यातील नागरिकांना भेडसावत असतील त्या संदर्भातील माहिती मला देण्यासाठी त्यांना माझी नियोजित वेळ म्हणजे “अपॉइंटमेंट” घेऊन येण्याची गरज नाही तर त्यासाठी ते मला दर मंगळवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत “बाळासाहेब भवन” येथे थेट प्रत्यक्ष घेऊन सांगू शकतात…

महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून ना.योगेशजी कदम यांच्याकडे गृह (शहर), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा, अन्न, औषधे व प्रशासन विभाग ही खाती आहेत…
अलीकडील कोंकणातील वादळग्रस्त शेतकरी बागायतदार ग्रामस्थांना भेटून तेथील वाताहतीची पाहणी व माहिती घेऊन शासकीय स्तरावर सहकार्याचे त्यांना आश्वासन दिले… यामुळे स्थानिक, आपल्या लाडक्या आमदारांच्या  धडाकेबाज कामगिरींबद्दल सर्वत्र गोडवे गाताना दिसतात….

मंत्री महोदयांनी नवी मुंबई पोलीस स्थानकास अचानक भेट देऊन ड्रग्स विरोधी कारवाया अधिक कडक करण्याच्या सूचना दिल्या… शाळा-कॉलेजांमधील वाढणारे ड्रग्स  सेवनाचे गंभीर प्रकार, महिलांवरील अत्याचार, सायबर गुन्हेगारी तसेच इतर गंभीर गुन्हे व पोलीस स्टेशनमध्ये चालू असलेल्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला तसेच पोलीस बांधवांशी संवाद साधून तेथील सोयी सुविधांची विचारपूस केली… त्याचप्रमाणे गुन्हेगारी संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले…

योगेशजी कदम यांनी राज्यमंत्रीपदाचा बेलभंडारा उचलताच त्यांनी कर्तव्यदक्षतेची चुणूक व तत्परता दाखवत मुंबई पोलीस आयुक्तालयास देखील भेट दिली… तेथे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला… सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, सायबर सुरक्षा व इतर बाबतीत यावेळी चर्चा केली व योग्य त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या…

५४ वर्षीय बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावरील अलीकडील  हल्ल्यासंदर्भात आणि उलटसुलट बातम्यांचे उठलेले पेव यासंदर्भात चौकशीअंती बोलताना मंत्री महोदयांनी सांगितले की, वांद्रे येथील बाराव्या मजल्यावरील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्यामागे अंडरवर्ल्डमधील कुणाही व्यक्तीचा हात नव्हता तर त्यामागे फक्त चोरीचाच उद्देश होता… त्यांना अशा प्रकारचा कधीच धोका नव्हता व त्याबद्दल सुरक्षेची त्यांनी कधी मागणी देखील केलेली नव्हती….