मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पुढील काही दिवस मुंबईच्या काही भागातील लोकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.पवई अॅन्कर ब्लॉक ते मरोशी जल बोगदा टनेल शाफ्ट दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे…
त्यामुळे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन्ही जलवाहिन्या अंशता खंडीत करून नवीन २४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने, बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून गुरुवार, दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत म्हणजेच एकूण ३० तास जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम सुरू राहणार आहे, म्हणजेच बरोबर सलग ३० तास हे जलवाहिनीचे काम सुरू असणार आहे.
दरम्यान या कालावधीत महापालिकेच्या एस/ एल/ के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर विभागातील काही परीसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या विभागातील नागरिकांना पुढे काही दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे असा फतवा पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याकडून व पालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी जारी करण्यात आला आहे.