चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
जो शरीर, धन आणि जन यांना गवता प्रमाणे समजून देवावर प्रेम करतो तो वैष्णव समजावा,असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार संदीप महाराज यादव यांनी केले आहे…. खालापूर तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्त वावंढळ यांचा ५६ वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे, या सप्ताहाचे पुष्परुपी कीर्तनाची माळ गुंफताना ते बोलत होते… जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या अत्यंत प्रसिद्ध आणि महत्वपूर्ण अभंगावर त्यांचे कीर्तन झाले….
वैष्णवाची अंतरिक चार लक्षण असतात, ज्यांच प्रेम देवावर आहे, जो शरीर, धन, जन यांना गवताप्रमाणे समजतो, कितीही दुःखाना सामोरे जावं लागलं तरी आपल्या नियमात बदल करत नाही आणि ज्याला जातीचं, काळाच, धर्माचं बंधन नाही तो वैष्णव समजावा, असे संत तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे असे सांगून वारकरी संप्रदायाच महत्वपूर्ण घटक वैष्णव आहे… सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील जांब्रूक हे गाव रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात वावंढळ या ठिकाणी स्व खर्चाने वसले आहे… जुन्या गावची रूढी परंपरा आजही जपल्या जातात, त्याचाच एक भाग अखंड हरिनाम सप्ताह आहे…. गावातील, स्त्री, पुरुष यांच्यासह पंचक्रोशीतील लोक हरिनाम सप्ताहासाठी येत असतात… श्री जानाई श्री ईंजाई देवस्थान ट्रस्ट, जय भवानी महीला मंडळ, जय भवानी तरुण मंडळ हे सक्रिय होऊन अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत…