अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्याचे नागरीकरण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना घनकचऱ्याची समस्या बिकट होत चालली आहे….
औद्योगिकीकरण त्याचबरोबर पर्यटनस्थळे यामुळे रायगड जिल्ह्याचे महत्त्व वाढत आहे…. जिल्ह्यात कचरा विघटन, सांडपाणी समस्या गंभीर होऊ लागल्या आहेत…. घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राउंड नसल्याने ही समस्या भविष्यात अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे…. रायगड जिल्ह्यात १० नगरपरिषदा, सहा नगरपंचायती आणि ८०९ ग्रामपंचायती आहेत…. नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात दिवसेंदिवस नवीन बांधकामे होत आहेत… शहरासह बाजूच्या ग्रामपंचायतींमध्ये बांधकाम क्षेत्र वाढत आहे… मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत… मात्र, बांधकाम करताना सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारे बांधण्याकडे दुर्लक्ष करण्यात येते…. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही उपयोजना बांधकाम व्यावसायिक करताना दिसत नाहीत…. प्रशासनाने यात वेळीच लक्ष घातलं नाही तर भविष्यात गंभीर समस्येला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे….