शेकाप शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी जयंत पाटील यांची ग्वाही… शेकाप कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…  

0
44

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

स्वातंत्रपूर्व काळापासून राज्याच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाचे एक वेगळ वर्चस्व राहिले आहे. गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी यांच्याशी शेकापची कायमच बांधिलकी राहिली आहे. जोपर्यंत अन्यायग्रस्त, पिडीत, कष्टकरी यांच्यासोबत आहोत तोपर्यंत शेकापला काहीच कमी पडणार नाही. सरकारी कार्यालये दलालांचे अड्डे झाले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करून जमीनी विकत घेणाऱ्यांविरोधात लढायचे आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे या भूमिकेतूनच अधिक प्रबळ काम करण्याची आपली भूमिका राहणार आहे. शेतकरी कामगार पक्ष शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहील, अशी ग्वाही शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिली. शेतकरी कामगार पक्ष अलिबाग तालुका कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा मंगळवारी दि.११ फेब्रुवारी रोजी पीएनपी नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता…यावेळी जयंत पाटील बोलत होते…

यावेळी मानसी म्हात्रे म्हणाल्या की, विधानसभेच्या जागेसाठी रात्रीचा दिवस करून कार्यकर्ते लढले. परंतु अनपेक्षीतपणे पराभव स्विकारावा लागला. मात्र पुन्हा एकदा मशाली पेटवून लढण्याची वेळ आली आहे. शेकाप संपला असे बोलणाऱ्यांनी मेळाव्यातील होणारी कार्यकर्त्यांची गर्दी बघा… असा टोला लगावत शेकापला संपविण्याचे स्वप्न पाहू नका, असा विरोधकांना सज्जड दम शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे यांनी त्यांच्या शैलीमध्ये दिला आहे..शेकापच्या संवाद मेळाव्यात आजची ही गर्दी एकनिष्ठ कार्यकर्त्यांची मांदीयाळी आहे… विधानसभेच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. तरीदेखील अनपेक्षित असे अपयश आले. परंतु पुन्हा नवी उभारी घेऊन कार्यकर्ते कामाला लागले त्याचा आनंद आज या मेळाव्याच्या अफाट गर्दीतून दिसून येत आहे. शेतकरी कामगार पक्ष एक वेगळा विचार आहे. गोरगरीब, कष्टकरी, कामगार व शेतकऱ्यांसोबत बांधिलकी असणारा पक्ष आहे. आपल्या तत्त्वाशी कायम राहणार पक्ष आहे. येथील भूमीपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, या मातीतील माणसाची प्रगती झाली पाहिजे, अन्यथा प्रकल्प बंद करू. तसेच सध्याची राजकीय परिस्थिती भयावह आहे. दलाल व चोरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. बाहेरील ठेकेदारांना ठेके देऊन टक्केवारी घेण्याचा प्रकार सुरु आहे. शेतकरी कामगार पक्षाने कधीही तत्त्वाशी तडजोड केली नाही, असे शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी प्रतिपादन केले आहे.

यावेळी माजी आ.बाळाराम पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, अॅड, गौतम पाटील, नंदकुमार मयेकर, संतोष जंगम आदी मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.