रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत ) :-
कानसई (नागोठणे )ते जे.एस. डब्लू कंपनी डोलवी पेणपर्यंत उभारण्यात येत असलेल्या 440 के व्ही एस हायटेन्शन बेकायदेशीर टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. या टॉवर लाईन विरोधात शेतकरी वर्गात असंतोष उफाळून आला असून सदरचे काम स्थगित न झाल्यास मोठा उद्रेक होईल अशी परीस्थिती दिसून येत आहे. संबंधित टॉवर लाईन ला शेतकऱ्यांनी हरकती दर्शविल्या असून याबाबतचे तक्रारी निवेदन शिवसेना रायगड जिल्हा युवा सेना प्रमुख संजय म्हात्रें व संबधित शेतकर्यांनी प्रांताधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी यांना तक्रारी निवेदन देऊन जलद कार्यवाहीची मागणी केलीय. हेच निवेदन आमदार महेंद्र दळवी यांना देखील देण्यात आलेय…
या टॉवर लाईनच्या विरोधात स्थानिक शेतकरी जनार्दन नाईक (डॉन) हे आमरण उपोषणास देखील बसणार असल्याचे निवेदन तालुका व जिल्हा प्रशासन स्थरावर देण्यात आले आहेत. नव्याने कानसई ते जे. एस .डब्लू कंपनी पर्यंत जे एस डब्लू टॉवर लाईन थेट शेत जमिनी मधून जात असल्याने कोलेटी , खार कोलेटी निगडे ,आमटेम सह विभागातील शेतकरी वर्गात असंतोषाची भावना उफाळून आली आहे. या टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे…ज्या ज्या ठिकानातून टॉवर लाईन जात आहे तेथील शेतकऱ्यांच्या समस्या व भावना जाणून घेऊनच टॉवर बाबतचा निर्णय प्रशासन व जेएसडब्ल्यू व्यवस्थापन यांनी घ्यावा अशी मागणी संजय म्हात्रें व शेतकर्यांनी केली आहे…