पाशवी बहुमत असून देखील पालकमंत्री ठरवता येत नाही हे सरकारचं दुर्दैव… सरकार केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करतंय…

0
24

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे…विक्रमी आणि पाशवी बहुमत मिळून सुद्धा  जिल्ह्याचा पालकमंत्री ठरवता येत नाही,हे या सरकारचे दुर्दैव आहे… हे बहुमत बेगडी असून सरकारला प्रशासनावर आपली पकड बसवता आली नाही… केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्या पलीकडे या सरकारने काहीच केले नाही… जनतेने जो कौल दिला त्याचा भ्रमनिरास झालाय…जसा जावई निवडताना चोखंदळपणा दाखवता तोच लोकप्रतिनिधी निवडताना दाखवला पाहिजे असे राजू शेट्टी म्हणाले…