उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण शहरात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच भीषण पाणी टंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. दर मंगळवारी शहरातील पाणी पुरवठा बंद असतो… तसेच १५ जानेवारी पासुन दर मंगळवारी आणि शुक्रवारी उरण शहराला पाणीपुरवठा बंद केला आहे… त्यामुळे अनेक सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे… पाण्याची मागणी वाढल्याने आणि उपलब्धतेत घट झाल्याने ही समस्या उद्भवली आहे… याबाबत पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वंजारी मॅडम यांना विचारणा केली असती, समाधानकारक उत्तर देत नाहीत, असे अनेक सोसायटीतील महिलांनी सागितले आहे…
शहरात पुनर्विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे… त्यानंतरच पाणीपुरवठा अनियमित झाल्याचे दिसून येत आहे… शहरात पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी काही ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे… मात्र एक महिन्यापासून खड्डे उघडे पडून आहेत… बाजारपेठेसारख्या गर्दीच्या भागात मोठ्या खड्ड्यांभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही… या खड्ड्यांमध्ये पडून एखादी दुर्घटना घडल्यास, जबाबदारी कोण घेणार ? प्रशासनावर गुन्हा दाखल करावा, अशी नागरिकांची मागणी आहे…रहिवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत… नगरपालिकेने त्वरित ठोस उपाययोजना करावी, अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा इशारा द्यावा लागेल, अशी भावना व्यक्त होत आहे…नगरपालिकेच्या निष्क्रीयतेवर रहिवाशांचा संताप सोसायटीच्या कमिटीने वारंवार नगरपालिका मुख्याधिकारी आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे… १५ ते २० दिवस उलटूनही समस्येवर उपाय न केल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे…नगरपालिका कर्मचारी अनभिज्ञ ?
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काही ठिकाणी खोदकाम करून खड्डे मारण्यात आले आहेत… मात्र, अजूनही पाणी मिळत नसल्याने नक्की काय अडचण आहे,हे प्रशासनालाच समजत नाही…त्यामुळे हा पाणी प्रश्न मार्गी लागणे कठीण बनले आहे…उरण नगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे…मात्र, कर वेळेवर भरूनही जर नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असेल, तर त्याची भरपाई नगरपालिका कशी करणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे…