शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण होईपर्यंत काम बंदचा इशारा… उच्चदाब विद्युत वाहिनी विरोधात शेतकरी एकवटले…

0
22

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-

शेतकऱ्यांच्या भरपाई संदर्भात अथवा निराकरण होत नाही तोपर्यंत उच्च विद्युत वाहिनीचे काम बंदच ठेवा असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील शिवसेना शिंदे गटाचे युवा जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे व शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकारी वर्गाला दिला… पेण, पाली विभागातील गावांमध्ये उच्च विद्युत वाहिनीचे टॉवर उभारण्याचे काम सुरू असून, या विद्युत लाईन मुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे…. या भागातील शेतकऱ्यांनी लढा सुरू केला असून, या संदर्भात आज प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या बरोबर अधिकारी वर्गाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते… या बैठकीस भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे, महापारेषणचे अधिकारी, जेएसडबल्यू कंपनीचे अधिकारी व बाधित शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते….

यावेळी  युवानेते वैकुंठ पाटील आणि युवा नेते संजय म्हात्रे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता उच्च दाब विद्युत वाहिनीचे जे काम सुरू आहे ते प्रथम थांबवावे, प्रथम शेतकऱ्यांशी चर्चा व्हायला पाहिजे होती, जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून, यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी असे ते म्हणाले…  यावेळी अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात समर्पक उत्तरे दिल्यामुळे शेतकऱ्यांनी या बैठकीत संताप व्यक्त केला व जोपर्यंत प्रशासन आम्हाला नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत आमच्या जमिनीत आम्ही महापारेषणला काम करू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला…

यावेळी युवा नेते वैकुंठ पाटील यांनी महापारेषण कंपनी किंवा ठेकेदार यांनी शेतकऱ्यांच्या जागेत जबरदस्तीने काम सुरू केले असून, या सदर्भात नोटीस अथवा माहिती देणे गरजेचे होते परंतु असे काही झाले नाही यामुळे योग्य तो निर्णय होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवा अशी मागणी आम्ही केली आहे… युवा नेते संजय म्हात्रे यांनी सांगितले की, महापारेषण कंपनीचे अधिकारी दंडेशाही पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनीत टॉवरचे काम सुरू केले असून, याबाबत आम्ही शासनाकडे पत्रव्यवहार केला परंतु प्रशासन अधिकारी वर्गाने बघ्याची भूमिका घेतल्याने आम्ही माननीय जिल्हाधिकारी तसेच येथील नेते आमदार महेंद्र दळवी, आमदार रवीशेठ पाटील यांच्या माध्यमातून या कामासंदर्भात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय व्हावा यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते… परंतु या बैठकीत सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने बैठकीस आलेल्या अधिकारी वर्गाने कोणतीही ठोस आश्वासन दिले नसल्या कारणाने आम्ही यापुढेही उच्च विद्युत वाहिनी विरोधात लढा सुरूच ठेवणार असे त्यांनी सांगितले…