महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाड हे ऐतिहासिक क्रांती भूमी असल्याने त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्यावर सत्याग्रह करून बहुजनांना पाणी पिण्यासाठी खुले करून दिले होते… या ठिकाणी असंख्य आंबेडकरी अनुयायी परदेशातून २० मार्च १४ एप्रिल या दिवशी अभिवादन करण्यासाठी येत असतात… त्यामुळे या चवदार तळ्यामध्ये साहूल व कचरा पालापाचोला चांद जास्त प्रमाणात असल्याने पाणी अस्वच्छ झाले आहे… तो कचरा चवदार तळ्याचे पाणी स्वच्छ करून तलाव स्वच्छ करावे… काही दिवसातच २० मार्च जवळ येत असून, या ठिकाणी दररोज आंबेडकर अनुयायी या चवदार तळ्यावर अभिवादन करण्यासाठी येत असतात… यामुळे तळ्याचा परिसर व पाणी स्वच्छ करण्यात यावी अशी मागणी महानगर परिषदेकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट महाड तालुका उपाध्यक्ष श्याम भाई कासारे यांनी केली आहे… त्यांनी आपल्या निवेदनात असे सांगितले आहे कि, महाड चवदार तळे स्वच्छ न झाल्यास तळ्यावरती उपोषण करण्याचाही इशारा दिला आहे…