अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण… २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान पारायणाचे आयोजन…  

0
63

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्‍या अर्थाने संत परंपरेच वारसा लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्‍या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली.महाराष्ट्रातील बहुतांश गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी पार पडतात. यावेळी गावातील सर्वच ग्रामस्थ, विविध संस्था सप्ताहाचा नियोजन करतात…आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील यावेळी सप्ताहाचे आमंत्रण दिले जाते…यातून गाव परिसरातील सर्व टाळकरी, माळकरी, भाविक, भजनी मंडळ एकत्र येऊन हा सप्ताह साजरा करतात. जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं सप्ताहाचे स्वरुप देखील बदलत गेले…अशातच ग्रामस्थ मंडळ खांदाड यांच्यावतीने श्री सोनभैरव मंदिर, खांदाड, ता. माणगांव, रायगड परमपुज्य श्री सद्गुरु शंकर दगडे महाराज (आंदोरी, सातारा), परमपुज्य सद्गुरु पांडूरंग सुतार महाराज आणि गुरुमाता सुनिती पांडूरंग सुतार (महाड) यांच्या कृपाशिर्वादाने श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी ते गुरवार दि. २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे…या पवित्र सप्ताहात सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे…शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजता पारायणाचा शुभारंभ करण्यात आला… कलश पूजन आणि वीणा पूजन गुरुवर्य श्री. अजीव पांडूरंग सुतार यांच्या शुभहस्ते पार पडले….२१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रोज पहाटे ५ वाजता – काकड आरती आणि हरिपाठ,सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ – श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण,दुपारी १२ ते १ – प्रवचन व कीर्तन,सायंकाळी ६ ते ७ – प्रवचन,रात्री ९ ते ११ – कीर्तन,मध्यरात्री १२ ते पहाटे ५ – हरीजागर होत आहे…

या पवित्र सप्ताहात विविध कीर्तनकार व प्रवचनकार आपले विचार मांडणार आहेत. यामध्ये ह. भ. प. अशोक अंबुले महाराज (माणगांव), ह. भ. प. सौ. दीपाली सुतार (महाड), ह. भ. प. पांडूरंग जाहे महाराज (चिपळूण), ह. भ. प. ज्ञानेश्वर मानवतकर महाराज (पुणे), ह. भ. प. डॉ. मारुती कोल्हाटकर (तळवली) आदींचा समावेश आहे.गुरुवार,२७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १० वाजता भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पारायणाची सांगता माघ कृ. १४ गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता सद्गुरु सेवा मंडळ, माणगांव यांच्या शुभहस्ते होईल.

या कार्यक्रमाद्वारे संतसेवा, भगवंत भक्ती आणि अध्यात्मिक विचारांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. पारायण, कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून वारकरी परंपरेचा जागर घडवून आध्यात्मिक उन्नती साधण्याचा हा एक प्रयत्न आहे.या पवित्र कार्यात श्री सोनभैरव मंदिर ग्रामस्थ मंडळ खांदाड, सद्गुरु सेवा मंडळ (महाड, दादली, दारगाव), सद्गुरु सेवा मंडळ (धरणाची वाडी, आंबिवला, भुवन, पाचरशेत), आदिनाथ वारकरी सांप्रदाय मंडळ (बोडशेत) तसेच अनेक भाविक सहभागी होत आहेत…माजी नगराध्यक्ष नगरपंचायत माणगावचे ज्ञानदेव पोवार,

अखंड हरिनाम सप्ताह अध्यक्ष  काशीराम बाजी पोवार आणि (उपाध्यक्ष) अनंता भागोजी पोवार यांनी सर्व भाविकांना आवाहन केले आहे की,या पवित्र सप्ताहात सहभागी होऊन आध्यात्मिक वातावरणाचा लाभ घ्यावा.तसेच या पवित्र ईश्वरी कार्यास सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार देखील मानले आहेत…