जळगाव शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
पारोळा तालुक्यातील आडगाव सावरखेडे,करमाड,जिराळी,तामसवाडी मुंदाने यासह जवळपास ६० टक्के शिवारात वादळी वारा सह अवकाळी पावसाने थैमान घातल्याने त्यामुळे शेतकऱ्यांचे ज्वारी,बाजरी,कांदा,डाळिंब,लिंबू,पपई, मक्का या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. तोंडाशी आलेला घास अवकाळीने पावसाने हिरावून घेतला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाकडून तात्काळ सरसकट पंचनामे करण्यात यावेत व शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केली आहे.
सकाळी आठ वाजता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून शेतकऱ्यांच्या अडचणीत तत्पर असणारे शेतकरी नेते सुनील देवरे यांनी तहसीलदार अनिल पाटील,तालुका कृषी अधिकारी श्री.आहेर यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधून पंचनामा करण्यासंदर्भात चर्चा केली… शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफी संदर्भात हुलकावणी दिली असून आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा अडचणीत आणले आहे आता तरी शासन अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढेल का? व शेतकऱ्यांचा आर्थिक उन्नती होईल का ?असे प्रश्न उपस्थित होत आहेत.