60 कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ… 17 वर्ष काम करणाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे कट कारस्थान…

0
23

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

अलिबाग तालुक्यातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये नवीन कामगार भरती आणि नव्याने काढण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेला कंत्राटी कामगारांनी विरोध केला आहे. तसे झाल्यास तब्बल 60कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. या बाबतचेनिवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे…

कंत्राटी कामगारांनी सोमवारी (7 एप्रिल) पंडित पाटील यांची भेट घेऊन लक्ष घालण्याची विनंती केली…अलिबाग तालुक्यातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना तीनवीरा, कुसुंबळे, रेवस झोन १, रेवस झोन २ आणि उमटे या योजनेमध्ये ६० कंत्राटी कामगार सन २००७ पासून देखभाल दुरुस्ती व पाणी वाटप करण्याचे काम करीत आहोत. रायगड जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती दिनांक २४/०४/२००७ च्यासभेत काम नं ०९ व ठराव क्र २२० नुसारआम्हास मान्यता देण्यात आली आहे.

या योजनांसाठी नव्याने कामगार भरती करण्यात येत आहे सुमारे ३० नवीन कामगार भरती केल्याचे समजते तसेच या योजनेसाठी टेंडर हि काढण्यात येत असल्याने हवालदिल झाली आहेत…जर का या संदर्भात टेंडर प्रक्रिया झाली तर २००७ पासून जे कामगार काम करित आहोत त्यांच्यावर अन्याय होणार आहे…तसेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे…दरम्यान, नव्याने सुरु असलेली टेंडर प्रक्रिया व नवीन कंत्राटी कामगार भरती रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

17 वर्षे काम करणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकल्यास रस्त्यावर उतरावे लागेल. नव्याने काढण्यात येणारी निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी. मुजोर प्रशासनाला धडा शिकवण्याची वेळ आली आहे.अशी प्रतिक्रिया माजी आमदार पंडित पाटील यांनी दिली आहे..