सरखेल कान्होजी आंग्रेचा अलिबाग पर्यटननगरी… मात्र पर्यटन नगरीला वाहतूक कोंडीचा विळखा…

0
29

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

जिल्ह्याचे मुख्यालय व पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या अलिबागला वाहतूक कोंडीचा सततचा विळखा असतो… यामुळे अपेक्षित वेळेपेक्षा अधिक काळ लागतो… स्थानिक प्रशासन असलेले नगरपरिषदेचे याबाबत योग्य नियोजन नसल्यामुळे हा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे… यामुळे वाढत्या वाहतूक कोंडीची अलिबागकरांसाठी कायम डोकेदुखी आहे… विशेषतः प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे…

सरखेल कान्होजी आंग्रेचा वारसा लाभलेले अलिबाग हे ऐतिहासिक शहर आहे… तसेच समुद्रात ऐतिहासिक कुलाबा किल्ला व शहरालगत अनेक प्रेक्षणीय स्थळेही आहेत… त्यामुळे पर्यटनाला मोठा वाव आहे. शनिवार-रविवारी इथं पर्यटकांचे लोंढे येत असतात… परंतु ही गर्दी, त्‍यामुळे वाढणारी वाहने यांना सामावून घेण्‍याची क्षमता अलिबागच्‍या रस्‍त्‍यांमध्‍ये नाही… त्‍यातच नगरपालिकेचे कुठलेच नियंत्रण नसल्‍याने वाहने बिनबोभाट पणे कुठून कुठेही येत असतात… वाहतूकीला अडथळा होईल अशा ठिकाणी वाहने उभी केलेली असतात… नो पार्किंगचे फलक केवळ शोभेसाठीच आहेत असंच म्‍हणावं लागेल…