रसायनी पोलीस स्टेशन झाले स्मार्ट… रसायनी पोलीस स्टेशनला मिळाले आयएसओ नामांकन…

0
17

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्याचे पालन करत पोलीस दल कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.पोलीस स्टेशन फक्त गुन्हे नोंदवण्याचे ठिकाण नसून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी व त्यांना सर्वतोपरी मदत होण्याच्या दृष्टीने एक सुसज्ज केंद्र बनविण्याच्या हेतूने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही पोलीस ठाण्यात येणारे तक्रारदार व सामान्य नागरिकांना सर्वोत्तम सेवा सुविधा प्रदान करण्याच्या हेतूने रायगड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्मार्ट कसे होतील याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या.त्यानुसार रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर,प्रकाश माळी,अनुसया ढोणे,व सर्व ठाणे अंमलदार पोलीस कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने निकषाची पूर्तता केल्याने रसायनी पोलीस ठाण्याला नुकताच  आयएसओ9001:2015 नुसारA++हा मानाचा दर्जा रसायनी पोलीस ठाण्याला प्राप्त झाल्याने बुधवार (दि२३) रोजी रसायनी पत्रकार संघाच्या वतीने रसायनी टाइम्सचे संपादक अनिल भोळे,ज्येष्ठ पत्रकार बी.एस. कुलकर्णी,आनंद पवार, लोकमतचे बाळासाहेब सावर्डे सर,यांनी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर व त्यांच्या सहकार्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.