अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
भारतीय शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्याचा पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन अलिबागच्या पेझारीत रविवार दि.१९ मे रोजी करण्यात आले होते.या मेळाव्याप्रसंगी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात आली. बंडखोरी काही शेकापला नवीन नाही.पक्षाच्या स्थापने पासून हे सुरू आहे. पक्ष सोडून गेलेल्यांचा मी विचार करत नाही मी त्याला महत्व देत नाही. परंतु आजच्या मेळाव्यातून इथल्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी त्यांना चोख उत्तर दिलं असल्याचे शेकाप नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. शेतकरी कामगार पक्षात अलीकडच्या काळात मोठी फूट पडून प्रमुख नेते भाजपमध्ये गेले. या पार्श्वभूमीवर शेकापने पेझारी इथं मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन केले. यावेळी जयंत पाटील बोलत होते.