महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने) :-
महाड दापोली मार्गावर काल झालेले एसटी बसच्या अपघातानंतर २४ तासाच्या आत पुन्हा दोन अपघात झाल्याने महामार्गावरील रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे… या दोन अपघातात जीवित हानी झाली नसली तरी पावसाळ्यात निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे जीवित हानी होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असून याला जबाबदार कोण असा सवाल शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला विचारला आहे…
महाड दापोली मार्गावर शनिवारी दुपारच्या सुमारास स्वारगेट एसटी डेपोची विन्हेरे स्वारगेट या बसला करंजाडी बुद्धवाडी येथील रस्त्यावर झालेल्या अपघातात १५ प्रवाशांपैकी सात प्रवासी चालक वाहकासहित जखमी झाले होते…या घटनेला २४ तासाचा कालावधी होण्याअगोदरच. पुन्हा याच मार्गावर शिरगाव जवळील गोमंत हॉटेल जवळ लग्नाच्या सोहळा पार पडून येणारी MH. ०८.Ax.१५४२ या क्रमांकाची इको कार रस्त्यावरून घसरून अपघात झाला…मात्र यात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही
महाड दापोली मार्गावर रेवताळे आंग्रे कोंड येथे M H. ०६.७८५३ ही टाटा कंपनीचा तुढील येथील आरिफ देशमुख मालवाहतूक टेम्पो रस्त्यावरून घसरून अपघात झाला… या घटनेत देखील कोणी जखमी झाले नसली तरी रस्त्याच्या डांबरीकरणावर असलेल्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीमुळे हे अपघात घडत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे…महाड दापोली मार्गावरील शिरगाव फाटा ते लाटवण फाट्यापर्यंतचा रस्ता असाच डांबरीकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे निसरडा झाल्या असल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी अवकाळी पावसामुळे असे अपघात घडत असताना ऐन पावसाळ्यात या मार्गावर जर अपघात झाले तर याला जबाबदार कोण असा सवाल शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी सार्वजनिक बांधकाम महाड येथील उपविभागीय अभियंता यांना विचारला आहे…
आज सकाळी पुन्हा सिमेंट वाहतूक करणारा ट्रकMH.०५.EL.२२८६ व ईरटीका कारMH.०४.kx.४४४ यांच्यात अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी पुन्हा एकदा या मार्गावर अपघात का होतात हा प्रश्न निर्माण झाला आहे…