अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
जून व जुलै महिना माशांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा काळ असतो…याशिवाय या दोन महिन्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे 1 जून ते 31 जुलै दरम्यान खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाची बंदी असते… मच्छिमार बांधवदेखील या काळात खोल समुद्रातील मासेमारी करीत नाहीत…मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्रालयाच्या जनता दरबारात मंत्री नितेश राणे यांनी श्रीवर्धन व अलिबाग तालुक्यातील मत्स्यव्यवसायाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.या चर्चेदरम्यान मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, तसेच या भागात बंदर उभारणीसाठी आवश्यक पावले उचलावीत अशी ठाम मागणी करण्यात आली… तसेच मोठ्या मच्छिमारी बोटींना १५ जुलैपर्यंत असलेली बंदी १५ ऑगस्टपर्यंत करण्याची मागणी केली…या मुद्द्यांवर माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला,ज्यामुळे या क्षेत्रातील विकासाला नक्कीच गती मिळेल अशी आशा आहे…यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्यासमवेत चित्रा पाटील यांची उपस्थित होती. मच्छीमार बांधवांच्या हक्कांसाठी आणि स्थानिक विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत…