कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
बोरले जिथे ते कुंभे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, ज्यामुळे प्रवासाला त्रास होत आहे…बोरले जिथे कुंभे रस्ता म्हणजे पूर्वीचा (पेशवाई रस्ता) जो आंबिवली, नेरळ ते दामत गावापर्यंत व पुढे जातो…परंतु जिते कुंभे रस्त्याचे काम हे सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड वाशी नवी मुंबई यांनी सन २०२२ मध्ये पूर्ण केले व त्या रस्त्यासाठी तब्बल २२८.९ लक्ष इतके खर्च केले आहेत.पण सध्या याच रस्त्याची दुरावस्था झाली आहे… एस.टी बस सेवा अशी चालत आहे की रस्त्यावर नव्हे तर समुद्रातून चालतानाचा अनुभव जनतेला येत आहे.
काम पूर्ण झाल्यापासून ५ वर्षे या रस्त्याची निगा ही सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पहायची आहे… मात्र देखभाल दुरुस्तीची,रस्त्याच्या बाजू पट्ट्यावरील गवत झुडपे काढणे,पावसामुळे पडलेल्या भेगांची दुरुस्तू करणे , डांबरी पृष्ठभागावरील खड्डे डांबरीने भरणे , रस्त्यालगतच्या गटारांची देखभाल व दुरुस्ती करणे पाईप मोरांची देखभाल दुरुस्ती करणे,रस्त्यालगतचे दक्षता,अधिसूचना फलकांची देखभाल व दुरुस्ती करणे,पाईप मोऱ्यांच्या भिंती रंगवणे परंतु हे काम कुठेच झालेले दिसत नाही.असा स्थानिकांनी आरोप केला आहे.
या गोष्टीला कुठेतरी कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अलिबाग रायगड व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था एम. आर. आर. डी. ए. ग्रामविकास व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांचा वरदहस्त आहे असे हि आरोप होत आहे. तर या मार्गावर पथ दिवे नाहीत शाळकरी मुली शाळा सुटल्यावर ह्याच रस्त्यावरून पाई प्रवास करतात त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाले तर ह्याला जबाबदार कोण?त्यात अपघाताची मालिका चालूच आहे…म्हणून स्थानिक प्रशासनाला वारंवार तक्रारी करून सुद्धा हे काम का होत नाही म्हणून स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.