“रायगडच्या उत्तर तालुक्यांमध्ये ‘विकसित कृषि संकल्प अभियान’ गेला घराघरात – शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद!”…

0
8

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

दि. २९ मे २०२५ पासून सुरू झालेल्या ‘विकसित कृषि संकल्प अभियान’ला रायगडच्या सुधागड-पाली, खालापुर, कर्जत, उरण, पनवेल व पेण तालुक्यांतील शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला असून ९ ते १२ जूनदरम्यान शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी आणि प्रगतिशील शेतकऱ्यांनी राबगाव, चिंचवण, चिरनेर, कासु आदी गावांत शेतकरी मार्गदर्शन सभा, शेत भेटी व समूह चर्चा आयोजित केल्या. भात रोपवाटिका, सुधारित बियाणे निवड व प्रक्रीया, यांत्रिकीकरण, मत्स्यशेती, फळबाग लागवड आणि शेतीपूरक व्यवसाय यावर माहिती देत शासन योजनांबाबत जनजागृती करण्यात आली. कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे संचालक, तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक अधिकारी व संकल्प अभियानातील शास्त्रज्ञ यांनी सहभाग घेतला. ग्रामपंचायती व शेतकरी संघटनांनी उत्साही सहभाग दर्शवून हे अभियान यशस्वी केले.