पुण्यातील वीस वर्षीय पर्यटकाचा मृतदेह सापडला ४३ तासांनी… हेलिकॉप्टर व ॲडव्हान्स थर्मल ड्रोनच्या सहाय्याने सापडला मृतदेह…

0
8

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामधील जगप्रसिद्ध असलेला काशीद समुद्र हा पर्यटकांना आकर्षित करीत असतो…पुण्याहून काशीद येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटक तनिष्क मल्होत्रा हा काशिद येथील समुद्रात बुडून बेपत्ता झाला होता…. याचा मृतदेह तब्बल ४३ तासांनी सापडला असल्याची माहिती मुरुड पोलिसांनी दिली आहे….

मुंबई पुणे पासून एक दिवसीय पर्यटनासाठी पुणे जिल्ह्यातील तनिष्क मल्होत्रा यांच्यासहित त्याचे मित्र मार्क मिल्टन (वय २० वर्ष), वरून तिवारी ( वय २० वर्ष ) पुण्य पाटील( वय २० वर्ष) हे चौघेजण मुरुड तालुक्यातील काशिद समुद्र किनारी आले होते… हे पुणे येथे पदवीधरच्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत…. समुद्रस्नान करण्यासाठी तनिष्क मल्होत्रा आणि त्याचे मित्र मार्क मिल्टन, वरुण तिवारी, पुण्य पाटील हे चौघेजण काशीद समुद्रात गेले…. तनिष्क मल्होत्रा हा मित्रासोबत खोल पाण्यात समुद्र स्नानासाठी गेला…. पाण्याची खोली (वाव) जास्त असल्या कारणाने त्याला पाण्याच्याबाहेर येता आले नाही… तो लाटांच्या जोराने कुठे तरी वाहत जाऊन तो पाण्यात दिसेनासा झाला होता…. तनिष्क मल्होत्रा याच्या शोध कार्यासाठी तटरक्षक दल, काशीद येथील लाईफ गार्ड तसेच स्थानिक नागरिक यांच्या मदतीने त्याचे शोधकार्य सुरु करण्यात आले… त्याच्या सोबत असलेले त्याचे तीन मित्रांना वाचवण्यात यश आले होते…. तनिष्क मल्होत्रा याच्या शोध कार्यासाठी तटरक्षक दल, रेस्क्यू, एस व्ही आर एस एस टीम, मुरुड पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी, काशीद येथील लाईफ गार्ड तसेच स्थानिक नागरिक यांच्या मदतीने त्याचे शोधकार्य सुरू होते….

आज दिनांक ३ जून २०२५ रोजी सकाळी सकाळी 07 वाजता हेलिकॉप्टर व ॲडव्हान्स थर्मल ड्रोनच्या सहाय्याने शोध कार्य सुरू केले आणि पावणे आठच्या सुमारास बुडालेल्या  तनिष्क मल्होत्रा या वीस वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला…. मृतदेह बाहेर काढून मुरुड पोलिसांच्या स्वाधीन केले… सदर मृतदेह हा मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे….

सध्या पावसाळी हंगाम असल्याने हा किनारा बंद ठेवण्यात आला आहे…. परंतु, काही उत्साही पर्यटक कोणालाही न जुमानता थेट समुद्रात उतरत आहेत…. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत…. पावसाळी हंगाम असल्याने समुद्रात पोहण्यास जाऊ नये असे आवहन मुरुड पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार देशमुख यांनी केले आहे….

काशीद येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने जीवितहानी टाळण्यासाठी निदान एक स्पीड बोट तैनात करावी, अशी मागणी पर्यटकांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे केली आहे….

देश विदेशातील पर्यटकांना रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्र भुरळ घालत असला, तरी धोकादायक ठरत आहे…. आजपर्यंत काशीद तसेच मुरुड तालुक्यातील विविध पर्यटन स्थळी जवळपास दीडशेच्या आसपास पर्यटकांचा मृत्यू झाला असून, असंख्य पर्यटकांचे जीव वाचविण्यात यश आले आहे….