श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (आनंद जोशी) :-
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या श्रीवर्धन शाखेने 22 सप्टेंबर 24 रोजी रायगड जिल्हाकवि संमेलन आणि गझल मुशायरा हा साहित्यिक कार्यक्रम श्री.पळधे केटरर्स यांचे मंडपात आयोजित केला होता.या कार्यक्रमास जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कवि उपस्थित होते.त्यात प्रामुख्याने कोमसाप रायगडचे अध्यक्ष सुधीर शेठ,समन्वयक अ.वि.जंगम, संजय गुंजाळ आदिंचा समावेश होता.
मान्यवरांचे हस्ते श्री गणेश पूजन,दीप प्रज्वलन झाल्यावर श्रीवर्धन शाखेच्या अध्यक्षा सौ.सीमा रिसबूड,अनिता कांबळे,सुधीर शेठ,अ.वि.जंगम ,वाचनालयाचे अध्यक्ष मनोज गोगटे यांचे मनोगत झाल्यावर संमेलनास सुरुवात झाली.कवी संमेलन व गझल मुशायरा अशा दोन भागांत कार्यक्रम
रंगला.कवी संमेलनाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक संजय गुंजाळ होते.कवी संमेलनात सर्वश्री गंगाधर साळवी,डाॅ.शीतल मालुसरे,दिपक सकपाळ,श्रेयस रोडे,नागेश नायडू,वैशाली साळुंके,नेहा प्रधान,ॠद्धी भगत,निकिता भोसले,छाया गोवारी,व स्थानिक श्री.भुर्के (नायब तहसिलदार),भक्ती केळस्कर,,आर्या कोसबे,
मनोज गुरव,शुभम वाणी,सौ.सीमा रिसबूड,अनिता कांबळे,सौ.शर्मिला जोशी यांनी स्वरचित काव्य रचना सादर केल्या. भोजनोत्तर झालेल्या गझल मुशायराच्या बहारदार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध गझलकारा ज्योत्स्ना रजपूत यांनी भूषविले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नायडू यांनी केले.या कार्यक्रमात योगेश दवटे,संगीता नाचपल्ले,मानसी चाफेकर,संध्या दिवकर,सिद्धेश लखमदे,नितीन सुर्वे,नागेश नायडू व अध्यक्षा ज्योत्स्ना राजपूत यांनी आपल्या बहारदार गझल रचना सादर केल्या.या सर्व कार्यक्रमाचे नेटके व काव्यमय सूत्रसंचालन सौ.पद्मजा कुळकर्णी यांनी केले.उपाध्यक्ष प्रसाद जोशी…यांनी केलेल्या ऋणनिर्देशानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.