ज्याचे मार्गदर्शन गाव स्वीकारतो त्याचे नेतृत्व समाज स्वीकारतो – ज्येष्ठ सनदी लेखापाल जी.व्हि.काळे

0
72

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-

‘ज्याचे मार्गदर्शन गाव स्वीकारतो त्याचे नेतृत्व समाज स्वीकारतो, समाजाची सेवा अतिशय प्रामाणिक केल्यामुळेच सुरेशनानांसारखे नेतृत्व समाज मान्य निर्माण होते’ असे गौरव उदगार ज्येष्ठ सनदी अधिकारी जी.व्हि.काळे यांनी काढले…
अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाचे माजी अध्यक्ष, कोयना प्रकल्प जनतेचे नेते, कोयना क्षत्रिय मराठा समाज माजी अध्यक्ष व राज्य सरकारचे निवृत्त लेखापाल, निर्मल ग्राम पुरस्कार विजेते सुरेश भाऊराव मोरे यांच्या ८८ व्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन सोहळा आणि त्यांनी लिहिलेल्या त्या स्मृतींच्या गंधकोषी पुस्तकाचे प्रकाशन करताना जी.व्हि.काळे बोलत होते… ते पुढे म्हणाले वयाच्या ८८ व्या वर्षी लेखन करणे म्हणजे सामान्य माणसासाठी केलेल्या कामांची ऊर्जा आहे… यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी सुरेश मोरे यांच्या जीवन कार्याचा उलगडा केला… कुटुंबाच्या त्यागातून सुरेश नानांचे नेतृत्व उदयास आले, त्यामुळे त्यांच्या यशात कुटुंबाचा वाटा आहे, असे प्रतापराव शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले…
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रतापराव शिंदे, कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयंत दरेकर, चिपळूणचे माजी सभापती बळीराम शिंदे, ज्येष्ठ निरुपणकार ह.भ.प.सुरेशबुवा कदम, कोयना प्रकल्पग्रस्त संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, अर्जुन पुरस्कार प्राप्त विजेते आणि भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार अशोक शिंदे, कोयना प्रकल्पग्रस्त नेते बळीराम शिंदे, लेखक, कवी, गायक अरुण साळुंखे, उद्योगपती जगन्नाथ मोरे, रमेश मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे, दसपटी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिंदे, प्रकाश साळुंखे, कोयना प्रकल्पग्रस्त संघटनेचे कार्याध्यक्ष पत्रकार अर्जुन कदम, अरविंद मोरे, भजन सम्राट अशोकबुवा मोरे, विलास कदम, अशोक मोरे, जयवंत कदम, यांच्यासह रायगड, ठाणे, पालघर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातील सगेसोयरे आणि कोयना प्रकल्पग्रस्त उपस्थित होते… कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय मोरे यांनी केले…