बीड,परभणी प्रकरणावरून विरोधकांचा आक्रमक पवित्रा… परभणी असो की बीड राज्याला लागलेली दहशतीची कीड…  

0
47

नागपूर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे…हे अधिवेशन पाच दिवस चालणार असून ते शनिवारपर्यंत दि.२१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यादरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ईव्हीएम, बीड, परभणी प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला…तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  यांनी पहिल्याच दिवशी बीड, परभणी प्रकरणावरून सरकारने उत्तर द्यावे अशी भूमिका घेतली…हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांकडे संख्याबळ नसतानाही त्यांनी आपला आक्रमकपणा दाखवून दिला. पहिल्याच दिवशी अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याच्याआधी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, ईव्हीएम, बीड तसेच परभणी संविधान विटंबनेवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला.विरोधकांनी ईव्हीएमविरोधात रान उठवतं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी केली…शिवाय बीडमध्ये हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचेही फोटो विरोधकांनी झळकावले….