चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
हिल इंडियन कंपनीच्या गेटवर कॅन्टींग कामगारांचे धरणे आंदोलन सुरू झाले असुन, या कामगारांना ३२ महिन्यांचा पगार दिला नसुन कामगारांच्या कुटुंबावर उपाशी रहाण्याची वेळ आली आहे… कॅन्टीन व्यवस्थापनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन सुरू केले आहे, असे कामगारांनी सांगितले…
खालापूर तालुक्यातील रसायनी परिसर हा औद्योगिक वसाहतीचा परिसर म्हणून ओळखला जातो… येथे अनेक कारखाने उभे असून, अनेकांचा रोजगार सुरू आहे… रसायनी परीसरातील हिल इंडिया कंपनीच्या कँटीन कामगारांना गेले ३२ महिने पगार देण्यात आला नाही… त्यामुळे कामगारांनी रितसर नोटिस देऊन आज कंपनीच्या गेटवर लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले असून कंपनी प्रशासनाला धारेवर धरण्यात आले आहे… यावेळी कामगारांच्या प्रमुख मागण्यांसह ३२ महिन्याच्या पगाराची अपेक्षा करत आज काहीतरी मार्ग निघेल या हेतूने कंपनीचा गेट अडवून कंपनीतील अधिकारी वर्गाला कंपनीच्या आवारात जाण्यासाठी रोखण्यात आले आहे… यावेळी गेटवर निदर्शने करून कंपनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली… कँटिनच्या कंत्राटी कामगारांनी आपले प्रश्न माध्यमांसमोर मांडत आपल्या प्रतिक्रिया दिल्या…
कंपनी प्रशासना विरोधात कोणतेही उग्र आंदोलन होऊ नये यासाठी रसायनी पोलीस प्रशासना कडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.