मुंबई शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील ):-
राज्याच्या राजकारण आणि समाजकारण तसेच सरकारवर दबावतंत्र टाकण्यात यशस्वी झालेल्या बळीराज सेनेत येत्या काळात मोठे संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत… पक्षप्रमुख अशोक वालम यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकसाठी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत…बळीराज सेनेने अवघ्या दोन वर्षात राज्यात आपला चांगलाच जम बसवीला आहे…अनेक अनुभवी पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षांकडे येत असल्याने संघटनेचे कार्य जलद गतीने होत आहे…याशिवाय पक्षप्रमुख वालम यांचा सरकारजवळ थेट संबंध असल्याने बहुजन समाजाची सरकार दरबारची कामे बळीराज सेनेमार्फत होत आहेत…त्यातच लोकनेते शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ निर्माण करून त्याला ठोस निधी मिळाला आहे…या महामंडळाचे काम नवनिर्वाचित अध्यक्ष भानगरथ यांचे नियोजनानुसार लवकरच सुरु होत आहे…यामुळे बहुजन समाजाला आर्थिक विकास करता येणार आहे…
दरम्यान 80% समाजकारण व 20% राजकारण या तत्वावर बळीराज सेना आता खेडोपाडी पोहोचली असल्याने नवतरुण कार्यकर्ते बळीराज सेनेला अधिक पसंती देत आहेत… येत्या काळात पक्षतर्गत मोठे बदल होणार आहेत…पक्षाचे जुने जाणते नेते कृष्णा कोबनाक यांचे निधन झाल्याने त्यांचे जागी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे…मिळालेल्या माहिती नुसार शरद बोबले यांच्यावर पक्ष मोठी जबाबदारी देणार आहे…तर कोकण विभागामध्ये सुद्धा नवे चेहरे दिसणार आहेत…आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मुंबई विभागात बळीराज सेनेचे संघटन वाढत आहे… सरकारला याकडे निश्चितच पहावे लागेल असे मत काही राजकीय नेत्यांनी व्यक्त केले आहे…