महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाड नगरपरिषदेच्या अंतर्गत महाड एसटी आगार ते महाड प्रांत कार्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गटारातील सांडपाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने रियाज मोहम्मद सिद्दिकी मोमीन या व्यक्तीने आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला होता… मात्र नगर परिषदेच्या प्रशासनाने लेखी उत्तर देऊन आश्वासन दिल्याने अखेर मोमीन यांनी उपोषण मागे घेतले परंतु यानिमित्ताने नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे…
महाड शहरातील महाड एसटी आगार ते महाड प्रांत कार्यालय या ठिकाणी असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटाराचे पाणी गटारामध्ये तुंबून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असल्याने व त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हॉटेल जय हिंद दिल्ली दरबारचे रियाज मोहम्मद सिद्दीक मोमीन यांनी यासंदर्भात आमरण उपोषण करण्याबाबत मागील वर्षी ३०/१२/ २०२४ रोजी महाड नगर परिषदेकडे अर्ज सादर केला होता… मात्र नगर परिषदेने याबाबत टाळाटाळ केल्याने अखेर त्यांनी आज आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला… मात्र याबाबत नगर परिषदेने मोमीन यांच्याशी उपोषणाच्या जागेवर जाऊन तातडीने संपर्क साधून त्यांना लेखी पत्र सादर केले…
महानगर परिषदेने मोमीन यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, नगर परिषदेच्या सर्वेअरमार्फत या रस्त्याची व गटाराची मोजणी करून घेतली आहे… मंजूर विकास योजनेनुसार रस्त्याचे रुंदीकरण व गटाराचे बांधकाम प्रस्तावित आहे…तथापि नगर परिषदेच्या आर्थिक स्थितीनुसार नगरपरिषद निधीतून सदरील काम हाती घेणे शक्य होत नाही… तरी शासन स्तरावरून नीधी उपलब्ध करून सदर रस्त्याचे रुंदीकरण व गटाराचे बांधकाम करून घेण्याची कारवाई करण्यात येत आहे…
तरी तूर्त या ठिकाणी असलेले जुने गटार मोकळे करून सांडपाण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात येत आहे… वरील बाब विचारात घेऊन आपण जानेवारीपासून प्रस्तावित केलेले आमरण उपोषण अखेर भाजपाचे अल्पसंख्यांक रायगड जिल्हा अध्यक्ष अश्रफ काजी मध्यस्थीनंतर अखेर उपोषण मागे घेतले… तसेच महाड नगर परिषदेच्या प्रशासनाने लेखी पत्र देऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन सहकार्य करावे अशी विनंती केल्याने मोमीन यांनी अखेर उपोषण मागे घेतले… मात्र उपोषण करण्याचा मार्ग अवलंबल्यानंतरच नगरपरिषद जागी होणार का, असा प्रश्न महाडकरांनी नगरपरिषद प्रशासनाला व राज्य सरकार तसेच लोकप्रतिनिधींना विचारला आहे…